शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 23:36 IST

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे.

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या सुधारणांवर संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. निवडणूक आयोग, विद्यापीठे, तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांवर आरएसएसकडून कब्जा केला जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलायला मी रिकामा नाही,' अशा शब्दांत टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.

आरएसएस प्रोजेक्ट अंतर्गत संस्थांवर कब्जा

राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत दावा केला की, आरएसएसच्या प्रकल्पांतर्गत देशातील विविध संस्थांवर आणि विशेषत: निवडणूक आयोगावर कब्जा करण्यात आला आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासोबत मिलीभगत करून निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्याही निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी मोठा वेळ दिला जातो, तो थेट पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अनुसरून असतो, असेही त्यांनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींनी आरोप केला की, सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये कायदा बदलला, ज्यामुळे कोणत्याही निवडणूक आयुक्ताला त्याच्या निर्णयासाठी शिक्षा करता येणार नाही. 'इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही,' असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर हल्ला चढवताना म्हटले की, महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या (आरएसएसच्या) प्रकल्पाचा पुढचा भाग हा भारताच्या संस्थात्मक संरचनेवर ताबा मिळण्याचा होता. 'आरएसएसने एकेक करून संस्थांवर ताबा करायला सुरुवात केली आहे. विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची नियुक्ती कशी होते, हे सर्वांना माहीत आहे,' असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केलेल्या या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याला महत्त्व न देता त्यांनी टोला लगावला. "राहुल गांधींच्या वक्तव्यावर मी बोलायला रिकामा नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. जर एखादी व्यक्ती विचार करुन बोलत असेल तर त्यावर मी उत्तर देईन. पण बकवास विधानांवर कशाला उत्तर देऊ," असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis dismisses Rahul Gandhi's allegations: 'I don't have time for that'.

Web Summary : CM Fadnavis ridiculed Rahul Gandhi's accusations against the central government and RSS regarding control over institutions. He stated he doesn't have time to respond to nonsensical statements.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ