शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मुख्यमंत्र्यांनी कामात कसूर केल्याचा आरोप; काँग्रेसकडून मुख्य सचिवांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:47 IST

राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक कायदा - २००५ च्या कलम ६० (बी) प्रमाणे नोटीस

मुंबई : जनता मुसळधार पावसात अडकलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख हे ‘महाजनादेश’ यात्रेतून मतदानाची भीक मागत फिरत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक कायदा - २००५ च्या कलम ६० (बी) प्रमाणे मुख्य सचिव अजय मेहता यांना भेटून नोटीस दिली आहे.राज्याला नैसर्गिक आपत्तीच्या संकटात वाऱ्यावर सोडल्याबद्दल तसेच कर्तव्यात कसूर केल्याची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री फडणीस आणि पुनर्वसन मंत्री देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे नोटीशीत म्हटले आहे. नोटिसीच्या ३० दिवसांत मुख्य सचिवांनी योग्य कार्यवाही न केल्यास मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाऊ असे पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पंचतारांकित प्रचार यात्रामुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल, संपूर्ण कोकण, नाशिक, पुणे, बदलापूर, कल्याण, सांगली, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री आणि राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे शासकीय खर्चाने पंचतारांकित प्रचार यात्रा करत फिरत आहेत असा आरोप ही पटोले यांनी केला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोले