शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:46 IST

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना महापुरूषांबद्दल एक विधान केले. ज्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. 

Sanjay Gaikwad News: हिंदी सक्तीविरोधात तीव्र पडसाद उमटले. सरकारने हिंदीबद्दलचे निर्णय रद्द केले. याच मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह काही महापुरूषांची नावे घेत असे विधान केले, ज्यावर वादाची ठिणगी पडली आहे. विरोधी पक्षाने यावरून संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, "जगामध्ये शिकायचं असेल, तर सगळ्या भाषा अवगत केल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराजा बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ मा साहेब या सगळ्या अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषेसह ते लोक मूर्ख होते का?", असे विधान संजय गायकवाडांनी केले.  

"यावर वाद करून मताचे राजकारण करणे चुकीचे आहे. मी तर थेट बोललो, अनेक ठिकाणी बोललो. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल, तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे", असे ते म्हणाले. 

'दिल्लीची चाकरी आणि सत्तेसाठी लाचार झालेल्यांना...', रोहित पवारांची टीका

संजय गायकवाड यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, " कशाची तुलना कशाशी करावी हे दिल्लीची चाकरी करणाऱ्यांना आणि सत्तेसाठी लाचार झालेल्यांना कधीच कळणार नाही..!"

"ते कळो अथवा ना कळो… पण किमान राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्यासह सर्वच महापुरुषांबद्दल बोलताना आब आणि आदर राखायचा असतो, याचं तरी भान या आमदार महाशयांनी ठेवावं", असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला. 

"बेभान होऊन हे आपल्या दैवतांचा अवमान करत असतील तर अशा बेभानांना भानावर आणण्याचं काम महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं, अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही", असे रोहित पवार म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांची संस्कृती झाली आहे -विजय वडेट्टीवार

संजय गायकवाड यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका केली. "छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात, कशासाठी तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचे उदाहरण देतो, भाषा काय वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे ? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली", असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण