शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी खदखद; छगन भुजबळ म्हणाले, "अनेक वर्षापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:01 IST

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा ३ महिन्यांसाठी छगन भुजबळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती

मुंबई - अलीकडेच राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदातून मला मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या अशी मागणी केली. अजित पवारांच्या या मागणीनंतर दादांना प्रदेशाध्यक्षपदाची ओढ लागल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर जयंत पाटलांनीही मला प्रदेशाध्यक्षपदी ५ वर्ष १ महिना झाला असल्याचे म्हटलं. राष्ट्रवादीच्या घटनेनुसार ३ वर्षापेक्षा अधिक कुणी एका पदावर राहू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू झाली. 

त्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटलं. त्यानंतर आता भुजबळ जातीच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीलाच घरचा आहेर दिला आहे. भुजबळ म्हणाले की, काँग्रेसने नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केले, वर्षा गायकवाड यांना मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पूर्वी राष्ट्रवादीत तसे होते. त्यानंतर हळूहळू दोन्ही पदे एकाच समाजाकडे ठेवण्याचे काम झाले. मंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदही असायचे काय पद्धत आहे कळाली नाही असं त्यांनी म्हटलं. 

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा ३ महिन्यांसाठी छगन भुजबळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यानंतर भुजबळ उपमुख्यमंत्री झाले आणि प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याला दिले. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असल्याची सातत्याने विरोधकांकडून टीका होते. त्यात अजित पवार यांनी संघटनेची जबाबदारी द्या म्हणत प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला होता. त्यानंतर भुजबळ यांनी ओबीसींना न्याय देणे गरजेचे आहे असं विधान केले होते. 

काँग्रेसनं नाना पटोले, भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांना संधी दिली हे तिघेही ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ओबीसी समाजाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी समाजाला दिले पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. सध्याच्या घडीला राष्ट्रवादीत छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे नेते आहेत. त्यापैकी कुणालाही द्या. जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या दृष्टीने पक्षाला फायदा होईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीय समीकरण बनवले जाणार का हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जातीNCPराष्ट्रवादी काँग्रेस