शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:35 IST

७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा या ओबीसींच्या मागण्यांसाठी ही सभा होणार आहे. 

नाशिक - एकीकडे राज्यात मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवलं आहे तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृ्त्वात राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा अशी मागणी करत ओबीसी एल्गार मेळावे घेतले जात आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजित करत आहेत. त्यानुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर आणि बीड येथे ओबीसी एल्गार मेळावे घेतले जाणार असून या सभांना भटके विमुक्त ओबीसी एसबीसी आणि अल्पसंख्याक  समाजातील बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 

ओबीसी आरक्षण बचावासाठी शनिवार, ६ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथे आणि शनिवार १३ जानेवारी रोजी बीड येथे ओबीसी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते सहभागी होणार आहे. या सभेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एल्गार देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा या ओबीसींच्या मागण्यांसाठी ही सभा होणार आहे. 

मनोज जरांगेविरुद्ध छगन भुजबळराज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादात मनोज जरांगे-छगन भुजबळ हे आमनेसामने आले आहेत. जरांगे यांनी त्यांच्या जाहीर सभेतून अनेकदा छगन भुजबळ यांच्यावर आक्रमक प्रहार केला. तर भुजबळांनीही ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर तोफ डागली. राज्यात मराठाविरुद्ध ओबीसी असं चित्र यामुळे निर्माण झाले आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी येत्या २० जानेवारीला जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईला धडक देणार आहे. तर बीड, पंढरपूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा भुजबळ ओबीसी समाजाच्या एल्गार मेळावे भरवत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेसोबतच शांतता कायम राहावी यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जातीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील