शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचे मानले आभार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 19:02 IST

सामान्यत: राष्ट्रवादीचे नेतेमंडळी शिंदे-भाजपा सरकारवर टीका करताना दिसतात, पण..

Chhagan Bhujbal: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक वेगळाच प्रकार राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाला. शिवसेना भाजपाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत गेली आणि त्यांना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे मविआचे नेते ओरडून ओरडून सांगत असतानाच, राज्यात अडीच वर्षांनी आणखी एक वेगळाच प्रकार घडला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाच्या ५० आमदारांच्या साथीने भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले. तेव्हापासून महाविकास आघाडीचे नेतेमंडळी, आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपा-शिंदे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण आज मात्र राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचे आभार मानले. यामागे नक्की कारण काय.. जाणून घेऊया.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. याबाबत आज शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ या महापुरूषांचे तैलचित्र लावण्यात आले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले. बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या तैलचित्राशेजारी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र