शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, "त्यांचा अभ्यास कमी, उगीच काही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 13:41 IST

मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरु आहे. मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. मुस्लीम समाजातील काही घटकांना २५ वर्षांपूर्वी आरक्षण दिलेले आहे. मनोज जरांगेचा अभ्यास कमी आहे. उगीच माहीत काही नसतंय बोलायचं म्हणून उगी बोलायचं. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाबद्दल खुश करण्यासाठी बोलायचं, असे छगन भुजबळ म्हणाले.

इम्पीरिकल डेटाबद्दलही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, १९९१ पासून समता परिषदेची मागणी होती. २०१६ साली माहिती गोळा झाली. मात्र पुढे आकडेवारी जाहीर झालेली नाही. आमचे म्हणणे आहे की, सेन्सर्स कमिशनकडून ती माहिती गोळा केली पाहिजे. कारण त्यांच्याकडून जेव्हा माहिती गोळा होते, त्यात चुकीची माहिती कुणी दिली तर त्याला शिक्षा आहे. रखडलेल्या दशवर्ष जनगणनेत जात गणना करा, ही आमची मागणी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

याचबरोबर, आमदारांच्या निधी वाटपाबाबत छगन भुजबळ म्हणाले, अजून कुणालाही ही काही मिळाले नाही. विकासकांसाठी पैसे मिळतात. उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. आचारसंहितेमुळे सर्व निर्णय पेंडिग आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याशिवाय, मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मला काहीच अपेक्षा नाही. खाते अपडेट वगैरे काही नाही. मला फक्त लोकांची काम करायची आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

काय म्हणाले होते मनोज जरांगे-पाटील?राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. मुस्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद निघाली असेल, तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. तसेच, त्यांना आरक्षण कसे मिळत नाही, तेच मी बघतो, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण