शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:25 IST

तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

नागपूर - मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मंगळवारपासून चर्चा सुरू आहे. त्यात अनेक नेत्यांनी आपापली मते मांडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भुजबळ जाहीर सभेतून करत असलेल्या भाषणावर चव्हाण यांनी टीका केली. त्याला भुजबळांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यात जो काही निर्णय होतो त्याला सामुहिक मंत्रिमंडळ जबाबदार आहे. जो निर्णय घ्यायचा तो मंत्रिमंडळात घ्या ना..जे काही मतभेद असतील पण बाहेर जाऊन समाजात तेढ निर्माण होईल असे आवेशपूर्ण भाषण केले जाते.मंत्रिमंडळात चर्चा करा. पण समाजासमाजात भांडणे लावायची ही तुमची राजकीय खेळी आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

त्यावर तुम्ही चांगले बोलता, नाव घेतले असते तरी बिघडले नसते. अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहातील २-२ सदस्यांची घरे पेटल्यानंतर, बायका-मुले अडकल्यानंतर, राखरांगोळी झाल्यानंतर तुमचे-आमचे काम होते, तिथे बघायला जाणे. हे दृश्य पाहिल्यानंतर मी स्वत:ला रोखू शकलो नाही. हे काय सुरू आहे. २ महिने सातत्याने हे सुरू होते. मी काहीच बोललो नाही. जे चूक ते चूक आहे हे सांगणे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? जीवघेणे प्रकार थांबवले पाहिजे हे सांगणे काम नाही का? बाहेर जाऊन चुकीचे घडत असेल. एका समाजाविषयी कुणी बोलत असेल तर दुसरा समाजही आहे त्याचेही काही म्हणणं आहे. मी फक्त बाहेर नाही तर मंत्रिमंडळातही बोललो आहे. मला सातत्याने शिवीगाळ होत असेल तर मी एकदा नव्हे तर १०० वेळा बोलणार असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिले. 

दरम्यान, जरांगे पाटील काही चुकीचे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू शकता.पण आपण या मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा काही जबाबदारी असते. तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळातून बाहेर जाऊन वाटेल ते बोला. हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री समर्थ आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा. राज्यात तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणChhagan Bhujbalछगन भुजबळWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaratha Reservationमराठा आरक्षण