शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:25 IST

तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

नागपूर - मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मंगळवारपासून चर्चा सुरू आहे. त्यात अनेक नेत्यांनी आपापली मते मांडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भुजबळ जाहीर सभेतून करत असलेल्या भाषणावर चव्हाण यांनी टीका केली. त्याला भुजबळांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यात जो काही निर्णय होतो त्याला सामुहिक मंत्रिमंडळ जबाबदार आहे. जो निर्णय घ्यायचा तो मंत्रिमंडळात घ्या ना..जे काही मतभेद असतील पण बाहेर जाऊन समाजात तेढ निर्माण होईल असे आवेशपूर्ण भाषण केले जाते.मंत्रिमंडळात चर्चा करा. पण समाजासमाजात भांडणे लावायची ही तुमची राजकीय खेळी आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

त्यावर तुम्ही चांगले बोलता, नाव घेतले असते तरी बिघडले नसते. अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहातील २-२ सदस्यांची घरे पेटल्यानंतर, बायका-मुले अडकल्यानंतर, राखरांगोळी झाल्यानंतर तुमचे-आमचे काम होते, तिथे बघायला जाणे. हे दृश्य पाहिल्यानंतर मी स्वत:ला रोखू शकलो नाही. हे काय सुरू आहे. २ महिने सातत्याने हे सुरू होते. मी काहीच बोललो नाही. जे चूक ते चूक आहे हे सांगणे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? जीवघेणे प्रकार थांबवले पाहिजे हे सांगणे काम नाही का? बाहेर जाऊन चुकीचे घडत असेल. एका समाजाविषयी कुणी बोलत असेल तर दुसरा समाजही आहे त्याचेही काही म्हणणं आहे. मी फक्त बाहेर नाही तर मंत्रिमंडळातही बोललो आहे. मला सातत्याने शिवीगाळ होत असेल तर मी एकदा नव्हे तर १०० वेळा बोलणार असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिले. 

दरम्यान, जरांगे पाटील काही चुकीचे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू शकता.पण आपण या मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा काही जबाबदारी असते. तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळातून बाहेर जाऊन वाटेल ते बोला. हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री समर्थ आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा. राज्यात तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणChhagan Bhujbalछगन भुजबळWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaratha Reservationमराठा आरक्षण