शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:25 IST

तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

नागपूर - मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मंगळवारपासून चर्चा सुरू आहे. त्यात अनेक नेत्यांनी आपापली मते मांडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भुजबळ जाहीर सभेतून करत असलेल्या भाषणावर चव्हाण यांनी टीका केली. त्याला भुजबळांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यात जो काही निर्णय होतो त्याला सामुहिक मंत्रिमंडळ जबाबदार आहे. जो निर्णय घ्यायचा तो मंत्रिमंडळात घ्या ना..जे काही मतभेद असतील पण बाहेर जाऊन समाजात तेढ निर्माण होईल असे आवेशपूर्ण भाषण केले जाते.मंत्रिमंडळात चर्चा करा. पण समाजासमाजात भांडणे लावायची ही तुमची राजकीय खेळी आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

त्यावर तुम्ही चांगले बोलता, नाव घेतले असते तरी बिघडले नसते. अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहातील २-२ सदस्यांची घरे पेटल्यानंतर, बायका-मुले अडकल्यानंतर, राखरांगोळी झाल्यानंतर तुमचे-आमचे काम होते, तिथे बघायला जाणे. हे दृश्य पाहिल्यानंतर मी स्वत:ला रोखू शकलो नाही. हे काय सुरू आहे. २ महिने सातत्याने हे सुरू होते. मी काहीच बोललो नाही. जे चूक ते चूक आहे हे सांगणे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? जीवघेणे प्रकार थांबवले पाहिजे हे सांगणे काम नाही का? बाहेर जाऊन चुकीचे घडत असेल. एका समाजाविषयी कुणी बोलत असेल तर दुसरा समाजही आहे त्याचेही काही म्हणणं आहे. मी फक्त बाहेर नाही तर मंत्रिमंडळातही बोललो आहे. मला सातत्याने शिवीगाळ होत असेल तर मी एकदा नव्हे तर १०० वेळा बोलणार असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिले. 

दरम्यान, जरांगे पाटील काही चुकीचे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू शकता.पण आपण या मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा काही जबाबदारी असते. तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळातून बाहेर जाऊन वाटेल ते बोला. हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री समर्थ आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा. राज्यात तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणChhagan Bhujbalछगन भुजबळWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaratha Reservationमराठा आरक्षण