शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

आदिवासींच्या शेतीमध्ये रासायनिक माती

By admin | Updated: October 27, 2014 02:22 IST

नवी मुंबईतील खैरणा येथील आडवली भुतालीतील आदिवासी शेतकऱ्यांवर तेथील शेटजींनी सुरू केलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडली

अजय महाडिक, मुंबईनवी मुंबईतील खैरणा येथील आडवली भुतालीतील आदिवासी शेतकऱ्यांवर तेथील शेटजींनी सुरू केलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडली असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून ठाणे महसूल प्रशासनाने मात्र बघ्याचीच भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना शेती करता येऊ नये, म्हणून शेतजमिनीवर टाकला जात असलेला भराव रसायनमिश्रित असल्याचा लेखी निर्वाळा राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स, चेंबूर यांनी दिला आहे.रसायनमिश्रित भरावामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा बाबजी मोहरा यांनी ‘लोकमत’कडे मांडली. शेटजीने स्वत:ला खोट्या कागदपत्रांच्या आधारे शेतकरी भासवून ही जमीन लाटली आहे. ठाण्यातील महसूल प्रशासनाचे सरकारी बाबूही त्यांच्याच ताटाखालचे मांजर झाल्याचे चित्र आहे. याबाबत ‘लोकमत’ने आदिवासी शेतकऱ्यांची बाजू मांडली असून, या प्रकरणाची भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दखल घेतली आहे.पिढ्यान्पिढ्या ज्या जमिनींवर शेती केली, त्या जमिनीवर बिनशेती विकासासाठी सोसायटी स्थापन झाल्याने बेघर होण्याची पाळी येथील ३३ आदिवासी कुटुंबांवर आल्याची बातमी दि. २६ जुलै २०१४च्या अंकात देण्यात आली होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हा घटनाक्रम असून, वास्तविक ज्या उद्देशाने सोसायटी स्थापन झाली त्यालाच फाटा देत ती जमीन व्यावसायिक कंपनीला विकू न आदिवासी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्यात आल्याचे वास्तव मांडण्यात आले होते.असा झाला अन्याय़़़वास्तविक फेरफार क्रमांक २२३, २२४, दि. ३० एप्रिल १९५६ला सर्व्हे नंबर २३/२, २८/१, २८/१ पै २८/२, २९/२, २९/२ पै, ६०/पै ही जमीन अनुक्रमे हुकूम नंबर टीएनसी एसआर - १ दि. २२ जानेवारी १९५४ व मुंबई सरकारचा महसूल विभागाचा ठराव क्रमांक २२५२/४९ दि. २७ फेब्रुवारी हुकूम नंबर टीएनसी एसआर ४० प्रमाणे संरक्षित कूळ व साधं कूळ म्हणून गोपाळ रामा मोहरा यांच्या नावे दाखल करण्यात आले. कागदपत्रांवरून १९५२ ते १९९८पर्यंत या संपूर्ण जमिनीवर मोहरा व त्यांचे कुटुंबीय भातशेती करीत होते. असे असताना शेतसारा नोंद १९९३पर्यंत दाखविण्यात आली. पुढे ही जमीन कागदोपत्री ओसाड दाखवून मयूरेश सिप्रॉनि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतली. दरम्यान, हा खरेदी व्यवहार करताना १९९७ साली कंपनीचे भागीदार बाळकृष्ण बबन जाधव व गोपाळ जुगलकिशोर बरसीया यांनी शेतकरी असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून हा व्यवहार पूर्ण केला आहे.