शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

विरोधकांच्या जिल्हा बँकांकडून फसवणूक, सहकारमंत्र्यांचा विधानसभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:47 AM

कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधीनागपूर : कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधकांवर केला.विरोधकांच्या प्रस्तावावरील उत्तर देताना आक्रमक झालेले देशमुख म्हणाले की, कुठे काय गडबड झाली अन् ती कुणी केली हे राज्याला कळलेच पाहिजे.कर्जमाफीच्या नावावर जिल्हा बँकांनी दिशाभूल केल्याची आकडेवारीच सभागृहात त्यांनी सादर केली. कर्जमाफीच्या नावाखाली भलत्यांचीच पोटं भरली जाऊ नयेत, म्हणून सरकार सतर्क होते. आम्ही आॅनलाइन अर्ज अनिवार्य करून सरकारचे ९७८ कोटी रुपये वाचविले, असे ते म्हणाले.मी कोणत्या पक्षाची कोणती बँक आहे, तिथे कोण संचालक आहेत अशी नावे घेणार नाही, असे सांगताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांची उदाहरणे दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगरजिल्हा बँकेने ३ लाख १९हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी दिली होती. प्रत्यक्षात २ लाख ५२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले.नाशिक जिल्हा बँकेने ३ लाख १९ हजार शेतकºयांची यादी दिली, पण प्रत्यक्षात १ लाख ९० हजार अर्ज आले. कोल्हापूर जिल्हा बँकेबाबतही तसेच घडले. बड्या संस्थांकडे जिल्हा बँकांची मोठी थकबाकी आहे; पण गरीब शेतकºयांना देण्यासाठी या बँकांकडे पैसा नाही.आधीच्या कर्जमाफीचे वाभाडे- आघाडी सरकारच्या काळात तब्बल ६ लाख २ हजार अपात्र शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली. कॅगच्या अहवालात हा सगळा भोंगळ कारभार आलेला आहे, असे ते म्हणाले. ४.२५ लाख शेतकºयांना कमी कर्ज देऊन त्यांच्या नावावर अधिक रक्कम दाखविण्यात आली.- अमरावती जिल्हा बँकेला कर्जमाफीचा छदामही मिळाला नाही, या वीरेंद्र जगताप (काँग्रेस) यांच्या आरोपाला उत्तर देताना देशमुख म्हणाले की, काहीही खोटे सांगू नका. राज्य सरकारने तब्बल २९२ कोटी रुपये कर्जमाफीसाठी तिथे दिले आहेत. तसेच २५० कोटी रुपयांचे फेरकर्ज मंजूर केले आहे. शेवटच्या लाभार्थी शेतकºयाला कर्जमाफी मिळत नाही तोवर कर्जमाफीची योजना थांबणार नाही.वर्धेच्या बापूराव देशमुख सूतगिरणीने तेथील जिल्हा बँकेचे २० कोटी रुपये थकविले आहेत. निफाड सहकारी साखर कारखान्याने नाशिक जिल्हा बँकेचे १४७ कोटी ४८ लाख रुपये तर मुंगसाजी कारखान्याने बुलडाणा जिल्हा बँकेचे ४१ कोटी तर आर्यन शुगरने सोलापूर बँकेचे १९३ कोटी तर शिवराज कारखान्याने १५९ कोटी व सांगोला साखर कारखान्याने ८१.४८ कोटी रुपये थकविले आहेत.राष्ट्रीयीकृत बँकाही लक्ष्यराष्ट्रीयीकृत बँकांना लक्ष्य करताना देशमुख म्हणाले की, स्टेट बँकेने कर्जमाफीच्या १३ लाख लाभार्र्थींची यादी दिली होती, पण प्रत्यक्ष आॅनलाईन अर्ज हे १० लाखच आले. बँक आॅफ इंडियाने ३.९७ लाख शेतकºयांची यादी दिली; पण आॅनलाईनमध्ये २.६२ लाख शेतकरीच असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार