शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

विरोधकांच्या जिल्हा बँकांकडून फसवणूक, सहकारमंत्र्यांचा विधानसभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:47 IST

कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधीनागपूर : कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधकांवर केला.विरोधकांच्या प्रस्तावावरील उत्तर देताना आक्रमक झालेले देशमुख म्हणाले की, कुठे काय गडबड झाली अन् ती कुणी केली हे राज्याला कळलेच पाहिजे.कर्जमाफीच्या नावावर जिल्हा बँकांनी दिशाभूल केल्याची आकडेवारीच सभागृहात त्यांनी सादर केली. कर्जमाफीच्या नावाखाली भलत्यांचीच पोटं भरली जाऊ नयेत, म्हणून सरकार सतर्क होते. आम्ही आॅनलाइन अर्ज अनिवार्य करून सरकारचे ९७८ कोटी रुपये वाचविले, असे ते म्हणाले.मी कोणत्या पक्षाची कोणती बँक आहे, तिथे कोण संचालक आहेत अशी नावे घेणार नाही, असे सांगताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकांची उदाहरणे दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगरजिल्हा बँकेने ३ लाख १९हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी दिली होती. प्रत्यक्षात २ लाख ५२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले.नाशिक जिल्हा बँकेने ३ लाख १९ हजार शेतकºयांची यादी दिली, पण प्रत्यक्षात १ लाख ९० हजार अर्ज आले. कोल्हापूर जिल्हा बँकेबाबतही तसेच घडले. बड्या संस्थांकडे जिल्हा बँकांची मोठी थकबाकी आहे; पण गरीब शेतकºयांना देण्यासाठी या बँकांकडे पैसा नाही.आधीच्या कर्जमाफीचे वाभाडे- आघाडी सरकारच्या काळात तब्बल ६ लाख २ हजार अपात्र शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली. कॅगच्या अहवालात हा सगळा भोंगळ कारभार आलेला आहे, असे ते म्हणाले. ४.२५ लाख शेतकºयांना कमी कर्ज देऊन त्यांच्या नावावर अधिक रक्कम दाखविण्यात आली.- अमरावती जिल्हा बँकेला कर्जमाफीचा छदामही मिळाला नाही, या वीरेंद्र जगताप (काँग्रेस) यांच्या आरोपाला उत्तर देताना देशमुख म्हणाले की, काहीही खोटे सांगू नका. राज्य सरकारने तब्बल २९२ कोटी रुपये कर्जमाफीसाठी तिथे दिले आहेत. तसेच २५० कोटी रुपयांचे फेरकर्ज मंजूर केले आहे. शेवटच्या लाभार्थी शेतकºयाला कर्जमाफी मिळत नाही तोवर कर्जमाफीची योजना थांबणार नाही.वर्धेच्या बापूराव देशमुख सूतगिरणीने तेथील जिल्हा बँकेचे २० कोटी रुपये थकविले आहेत. निफाड सहकारी साखर कारखान्याने नाशिक जिल्हा बँकेचे १४७ कोटी ४८ लाख रुपये तर मुंगसाजी कारखान्याने बुलडाणा जिल्हा बँकेचे ४१ कोटी तर आर्यन शुगरने सोलापूर बँकेचे १९३ कोटी तर शिवराज कारखान्याने १५९ कोटी व सांगोला साखर कारखान्याने ८१.४८ कोटी रुपये थकविले आहेत.राष्ट्रीयीकृत बँकाही लक्ष्यराष्ट्रीयीकृत बँकांना लक्ष्य करताना देशमुख म्हणाले की, स्टेट बँकेने कर्जमाफीच्या १३ लाख लाभार्र्थींची यादी दिली होती, पण प्रत्यक्ष आॅनलाईन अर्ज हे १० लाखच आले. बँक आॅफ इंडियाने ३.९७ लाख शेतकºयांची यादी दिली; पण आॅनलाईनमध्ये २.६२ लाख शेतकरीच असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार