शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Coronavirus : कोरोनाच्या बदलत्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोरही आव्हान : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 21:31 IST

राज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

ठळक मुद्देराज्यातील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणालसीकरण अधिक वेगवान करण्यावर भर देणार : मुख्यमंत्री

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र कमी झालेला नाही. "कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या आपला डॉक्टरांशी सातत्याने संवाद आणि माझा डॉक्टर ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. राज्यातील जनतेशी आज त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. तसंच ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल केले जातील आणि ज्या ठिकाणी प्रादुर्भाव अधिक आहे त्या ठिकाणी निर्बंध वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे.  हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे," असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार केला. सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले. लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला. दोन्ही टास्क फोर्समध्ये वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद होत असतात असंही त्यांनी नमूद केलं.उपचार पद्धतीत एकसूत्रता हवी, विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे डॉक्टर्सना तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावे व त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे, यावरील नवनवीन माहिती त्यांना मिळावी व सर्व डॉक्टर्सचा सहभाग वाढवा म्हणून ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. लसीकरण वेगवान करणार४५ च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. सव्वादोन कोटी नागरिकांना आपण लसीकरण केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरFacebookफेसबुक