शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पाथरीचे नामांतर 'साई धाम' करा; मेघना बोर्डीकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 11:05 IST

बोर्डीकर यांनी जन्मभूमी पाथरी ते कर्मभूमी शिर्डी असा कॉरिडोर सुरू करण्याची मागणीही केली आहे. 

मुंबई - साई बाबा यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीवरून सुरू झालेला वाद आता संपला असं चित्र निर्माण झाले असताना आता पाथरीचे नामांतर करण्याची मागणी होत आहे. साई बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरीचे नाव बदलून 'साई धाम' करावे, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे. त्यामुळे साई जन्मभूमीचा वाद आता पुन्हा चिघळतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई बाबांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी विकासनिधी जाहीर केल्यानंतर हा वाद उफळून आला. पाथरी साईबाबांची जन्मभूमी असल्याच्या दाव्याला शिर्डीकरांनी विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला होता. मात्र जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आता या मुद्दावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

पाथरी साईबाबांची जन्मभूमी असल्याचे आता कागदोपत्री सिद्ध झालेच आहे. हे सर्वांना ठावूक होण्यासाठी पाथरीचे नामांतर करून साई धाम असे करावे, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. परभणी जिल्ह्यातील प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावे यासाठी त्या आग्रही आहेत. 

मेघना बोर्डीकर यांच्यासह परभणी जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे साई बाबांच्या जन्मभूमीच्या मुद्दावर एकमत झालेले आहे. बोर्डीकर यांच्यासह आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगर परिषदेला नामांतरासाठी ठराव घेण्यास सुचविले आहे. यासह बोर्डीकर यांनी जन्मभूमी पाथरी ते कर्मभूमी शिर्डी असा कॉरिडोर सुरू करण्याची मागणीही केली आहे.