शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’तील बदलामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार तब्बल दीड हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:10 IST

मूळ आधार टक्केवारीत केंद्राकडून बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटना कोर्टात जाणार

पुणे : केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) मूळ आधार टक्केवारीत साडेनऊवरून १० टक्के असा बदल केला आहे. त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना १ हजार ४६५ कोटी आणि देशपातळीवर साडेचार हजार कोटींचा फटका बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार आहे.यापूर्वी एफआरपी किंमत देताना ९.५ टक्केप्रमाणे साखर उतारा आधार घेण्यात येत होता. त्यानुसार २ हजार ५५० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊस देय रक्कम निर्धारित केली जात होती. तसेच साडेनऊ टक्क्यांपुढील प्रत्येक वाढीव टक्क्यासाठी २७० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊसदरात वाढ देण्यात येत होती. मात्र, आगामी हंगामासाठी १० टक्क्यांप्रमाणे उसातून साखर मिळेल, असे गृहीत धरले. त्यानुसार २७५० रुपये प्रतिटन दर निर्धारित केला आहे. ज्या शेतकºयांचा साडेअकरा टक्के साखर उतारा असेल, त्यांना ९.५ टक्क्यांप्रमाणे प्रतिटन ३ हजार ३२८ रुपये मिळाले असते. मात्र, १० टक्के हा नव्याने निर्धारित केलेल्या आधारानुसार ११.५ टक्के साखर उतारा मिळालेल्या ऊसउत्पादकांच्या हाती ३ हजार १६२ रुपये प्रतिटनप्रमाणे रक्कम मिळणार आहे. यात पुन्हा तोडणी वाहतूक खर्चात कपात होईल. या हंगामात राज्यात ९०० लाख टन ऊसाचे गाळप अपेक्षित आहे. शेतकºयांना १० टक्के साखर उताऱ्याप्रमाणे प्रति टन १६५ रुपयांचा फटका बसणार आहे.एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतलेगत हंगामाकरिता २ हजार ५५० रुपये प्रतिटन असलेल्या उसाच्या आधारभूत किमतीमध्ये यंदा केंद्र सरकारने २०० रुपये प्रतिटनाने वाढ केली आहे. मात्र, त्याच वेळी साखर उताºयाच्या मूळ आधारभूत टक्केवारीत अर्धा टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे एका हाताने दिलेली वाढ दुसºया हाताने काढून घेत शेतकºयांची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने