शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चंद्रकांत पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:40 IST

विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या खात्याच्या मंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात आला. 

मुंबई - राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडेच अयोध्या बाबरी आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांनी केलेलं विधान वादात सापडले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पाटलांना टार्गेट करत थेट त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. आता ठाकरे गटाच्या युवासेनेनं  राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्र पाठवून मुंबई विद्यापीठातील मनमानी कारभारावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. 

युवासेनेने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेची परीक्षा बुधवारी १२ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली परंतु सदर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी देण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची अत्यंत महत्त्वाची अभ्यासाची वेळ वाया गेली. राज्य सामाईक परीक्ष कक्षाकडून MBA प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यात परीक्षा केंद्र देण्यात गोंधळ करण्यात आला. त्यानंतर १५० मिनिटांची परीक्षा काही विद्यार्थ्यांची १८० मिनिटे घेण्यात आली. अशा विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या खात्याच्या मंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात आला. 

त्याचसोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८० मध्ये उत्तीर्ण झाले, त्यांनी त्यांचे पदवी प्रमाणपत्र १९८७ साली घेतले होते. परंतु हे गहाळ झाल्यामुळे नक्कल प्रमाणपत्र विद्यापीठाची आवश्यक प्रक्रिया न करता फक्त १ दिवसांत २३ मार्च २०२३ रोजी आपल्या पदाचा दबाव टाकून घेतले. त्याचवेळी अनेक विद्यार्थी एक महिन्यापूर्वी अर्ज करुनही प्रमाणपत्र मिळालेले नाही याचा अर्थ मंत्र्यांना एक न्याय आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असा सवाल युवासेनेचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी विचारला आहे. 

दरम्यान, या सर्वबाबी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री त्यांचे खाते सांभाळण्यास सर्वप्रकारे अपयशी ठरले आहेत. परंतु आपल्या खात्याचा गैरवापर स्वत:करिता केला आहे. तरी चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे आणि समस्त विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी युवासेनेने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamesh Baisरमेश बैस