शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Chandrakant Patil Exclusive : अमित शाहंची लगीनगाठ खरंच चंद्रकांतदादांनी बांधली?; ऐका 'लग्नाची गोष्ट' त्यांच्याचकडून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:07 IST

Chandrakant Patil Amit Shah : अमित शाह यांची लगीनगाठ बांधण्यामागे खरंच चंद्रकात पाटील यांचा रोल होता, अशी अनेकांची धारणा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. तर दुसरीकडे अमित शाह यांची लगीनगाठ ही चंद्रकांत पाटील यांनीच बांधली अशी अनेकांची धारणा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलखुलासपणे उत्तर दिलं. अमित शाह यांच्या पत्नी कोल्हापूरच्या असल्या तरी त्याचा आणि अमित शह यांच्याशी असलेल्या संबंधाचा काहीच संबंध नाहीये असं ते म्हणाले. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से पाटील मनमोकळेपणानं बोलले.  

"१९८२ मध्ये माझ्याकडे विद्यार्थी परिषदेचं गुजरातचं काम आलं होतं. अमित शाह त्याच वेळी भाजपकडे जात होते. ते गुजरातचे विद्यार्थी परिषदेचे सेक्रेटरीही होते. त्या ठिकाणी आमची पहिल्यांदा ओळख झाली. ते कोल्हापूरचे जावई आहेत याबद्दल मला नंतर समजलं. त्यांचं लग्न मी जमवण्यासारखा काहीच प्रश्न नाही," असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांचं लग्न जुळवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

९५ पर्यंत गुजरातची जबाबदारी"१९८२ ते १९९५ या कालावधीदरम्यान माझ्याकडे गुजरातची जबाबदारी होती. दर चार महिन्यांनी महाराष्ट्र गुजरात असा राऊंड असायचा. त्यावेळी गुजरातमध्ये गेल्यानंतर अमित शाह यांची भेट व्हायची. संघटनेत पूर्णवेळ कार्यकर्त्यांना पॅरेंट (पालक) देण्याची पद्धत आहे आणि गुजरातमध्ये काम करणाऱ्यांचे पालक हे अमित शाह होते. प्रवासी कार्यकर्त्यांनी या पालकांची भेट घ्यायची असते. अशाप्रकारे तो परिचय वाढत गेली," असं पाटील म्हणाले.जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यानंतर २०१४ च्या निवडणुका आल्या. युती होणार की नाही अशी चर्चाही होती. अमित शाह देवी अंबाबाईचे भक्त आहेत. ते अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणार की नाही अशी चर्चाही होती. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी गणपतीच्या दिवसांमध्ये मी अमित शाह यांनी युती नंतर पाहू मुंबईत आलात तर मातोश्रीवर गणपतीसाठी तुम्हाला जावं लागेल असं सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी निवेदन दिलं तर जाईन असं ते म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी संवाद साधला आणि त्यांनी आमंत्रणही दिलं. त्यानंतर त्यांना भेटण्याचे फायदेही लक्षात आले. त्यानंतर महाराष्ट्रात गोष्टींमध्ये ते गृहित धरू लागल्याचंही पाटील म्हणाले.

सरकार आल्यानंतर त्यांनी मंत्रिपद घेण्यासही सांगितलं. त्यानंतर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, असे अनेक प्रसंग आले. त्यांनी जबाबदारीही दिली. त्याची सुरूवात कोल्हापूर नाही, तर अहमदाबाद आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहchandrakant patilचंद्रकांत पाटील