शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

चंद्रकांतदादांनी कन्नड अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 22:08 IST

महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.

बेळगाव : महाराष्ट्राचे महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारची कन्नडसक्ती सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्र्यानेच कन्नडमधून गीत गायल्याने नवा वाद सुरू झाला आहे.तवग येथे शुक्रवारी सायंकाळी दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे होते. यावेळी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी ही या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चंद्रकांतदादा यांनी कन्नडमधून ‘जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे’(हुट्टीदरे कन्नड नल्ली हुट्टबेकु) हे दाक्षिणात्य अभिनेता राजकुमारचे गीत गायले. हे गीत गाऊन कन्नड लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले, गेली 61 वर्षे बेळगावात सीमावाद असला तरी कन्नड, मराठी भाषिक एकीनेच राहत आहेत, अशात भाषाभेद कसला करता, सीमावाद असला तरी एकीने, सौहार्दाने राहावं, असा सल्लाही उपस्थितांना दिला.दरम्यान, चंद्रकांतदादा यांनी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याबद्दल सीमाभागातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. मराठी युवा मंच एकीकरण समितीने याचा निषेध केला. समितीने म्हटले आहे की, गोकाकमधील कन्नड लोकांना खूश करण्यासाठी आपण गीत म्हटलं; मात्र आपण समन्वयक मंत्री म्हणून बेळगावात मराठी लोकांत एकदाही गेलेला नाहीत. मराठीचा द्वेष करणा-यांच्या कार्यक्रमात जाऊन कन्नडमध्ये गीत गाण्याची कृती सीमाभागातील मराठी जनांच्या भावनांवर मीठ चोळणारी आहे. सीमाप्रश्नाबाबत आपणाला किती गांभीर्य आहे हे कळून चुकलं आहे या शब्दात त्यांचा निषेध केला आहे. बेळगावातील सोशल मीडियात देखील पाटील यांचा निषेध केला जात आहे.चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावी. भाजपचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे या कृतीवरुन समजते.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत कर्नाटकातील कन्नड लोकांना खूश करून मते मिळविण्यासाठी मराठीजनांच्या भावना दुखावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.- राजू पावले, येळ्ळूर विभाग समितीचे एकीकरण समितीचे कार्यकर्ते.भाजपच्या जाहिरातबाजीसाठीच.........कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जाहिरातबाजी करण्यासाठी चंद्रकांतदादांनी कन्नड गीत आळवले; पण सीमाभागात याच कन्नडजनांच्या लाठ्या खाऊन मराठीजन विव्हळत आहेत याची जाण त्यांना राहिली नाही अशा प्रतिक्रिया मराठी भाषकांतून येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील