शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

चंद्रकांतदादांची मुदतही संपली; सगळे आलबेल - खासदार संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 12:39 IST

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कोणाला उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या; पण सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे, आणखी तीन वर्षे सरकार टिकणारच, अशी प्रतिक्रिया खा.राऊत यांनी दिली. वर्षा बंगल्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे आलबेल आहे. सरकार उर्वरित कार्यकाळ पूर्ण करणार, असे विधान शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून बाहेर पडल्यानंतर केले. त्यातच, ‘‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची मुदत संपल्याने राज्यातील सत्तांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कोणाला उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या; पण सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे, आणखी तीन वर्षे सरकार टिकणारच, अशी प्रतिक्रिया खा.राऊत यांनी दिली. वर्षा बंगल्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील विधानाचा वेगळा अर्थ काढून काही जणांच्या आशा वाढल्या असतील; पण त्यात तथ्य नाही. भावी मित्र असा जो उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा अर्थ हा तिकडचे काही नेते महाविकास आघाडीत येऊ इच्छितात, असा होतो. त्यामुळे मुख्यमंत्री अचानक नाही तर जाणीवपूर्वक तसे बोलले होते. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे आणि सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावा राऊत यांनी केला. पाटील दिलेली मुदत आज संपल्याने त्यांचा दावा फुसका ठरला. 

आजी, माजी अन् भावी- देहू (जि.पुणे) येथे आयोजित एका कार्यक्रमात संचालनकर्त्याने पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला, तेव्हा व्यासपीठावर असलेल्या पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, असे विधान केले होते.- पाटील यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील भाषणात, ‘माजी अन् एकत्रित आलो तर भावी’ असा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडे कटाक्ष टाकून केल्याने खळबळ उडाली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना