शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांची मुदतही संपली; सगळे आलबेल - खासदार संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 12:39 IST

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कोणाला उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या; पण सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे, आणखी तीन वर्षे सरकार टिकणारच, अशी प्रतिक्रिया खा.राऊत यांनी दिली. वर्षा बंगल्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे आलबेल आहे. सरकार उर्वरित कार्यकाळ पूर्ण करणार, असे विधान शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून बाहेर पडल्यानंतर केले. त्यातच, ‘‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची मुदत संपल्याने राज्यातील सत्तांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर कोणाला उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या; पण सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे, आणखी तीन वर्षे सरकार टिकणारच, अशी प्रतिक्रिया खा.राऊत यांनी दिली. वर्षा बंगल्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील विधानाचा वेगळा अर्थ काढून काही जणांच्या आशा वाढल्या असतील; पण त्यात तथ्य नाही. भावी मित्र असा जो उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा अर्थ हा तिकडचे काही नेते महाविकास आघाडीत येऊ इच्छितात, असा होतो. त्यामुळे मुख्यमंत्री अचानक नाही तर जाणीवपूर्वक तसे बोलले होते. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे आणि सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावा राऊत यांनी केला. पाटील दिलेली मुदत आज संपल्याने त्यांचा दावा फुसका ठरला. 

आजी, माजी अन् भावी- देहू (जि.पुणे) येथे आयोजित एका कार्यक्रमात संचालनकर्त्याने पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला, तेव्हा व्यासपीठावर असलेल्या पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, असे विधान केले होते.- पाटील यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील भाषणात, ‘माजी अन् एकत्रित आलो तर भावी’ असा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडे कटाक्ष टाकून केल्याने खळबळ उडाली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना