टोल बंदला आव्हान
By Admin | Updated: June 29, 2014 00:46 IST2014-06-29T00:46:52+5:302014-06-29T00:46:52+5:30
44 टोलनाके बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात काही कंत्रटदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े

टोल बंदला आव्हान
>मुंबई : 44 टोलनाके बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात काही कंत्रटदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े
या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आह़े मंगळवारी टोलनाके बंदची अंमलबजावणी होणार असल्याने न्यायालय यावर काय आदेश देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े
महत्त्वाचे म्हणजे टोलनाके बंद होणा:या कंत्रटदारांना एकूण 3क्6 कोटी रुपये नुकसानभरपाई शासनाने जाहीर केली आह़े प्रत्यक्षात कंत्रटदारांची 3 हजार कोटी रुपयांची थकबाकी आह़े
तसेच कमी किमतीचे टोलनाके बंद करणार असल्याचे शासनाचे म्हणणो आह़े मात्र हे चुकीचे आह़े कंत्रटदारांनी रस्ते विकासासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत़ या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळाला आह़े अचानक टोलनाके बंद झाल्यास संबंधित कामगार व अधिका:यांच्या रोजगारावर गदा येईल़ तेव्हा टोलनाके बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े
महाराष्ट्रात एकूण 166 टोलनाके आहेत़ त्यातील 73 सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत़ तर 53 एमएसआरडीसीचे असून, 4क् राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहेत़ यांपैकी 34 सार्वजनिक बांधकाम विभागाचे व 1क् एमएसआरडीसीचे टोलनाके बंद होणार आहेत़ (प्रतिनिधी)
च्नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज पाहणी केली. सदर टोलनाका बंद करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याची माहिती तावडे यांनी या वेळी दिली.
च्खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या या टोलनाक्यासंदर्भात भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी तावडे यांना अलीकडेच एक निवेदन दिले होते. त्यानुसार तावडे यांनी आज या टोलनाक्याला भेट दिली.
च्या वेळी त्यांनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. राज्य सरकार एकीकडे टोल बंदीची घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे नवीन टोलनाके उभारून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
च्या वेळी त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुरांवरही टीका केली. या प्रकरणी आपण स्वत: सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, हा टोल नाका बंद करण्याबाबत विनंती करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.