शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 18:07 IST

अजित पवार यांच्या बारामतीची जागा लढण्याच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेसोबत युती करत राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यातच अजित पवार यांनी आपल्या गटाच्या राज्यव्यापी  शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर थेट हल्लाबोल केल्याने दोन्ही गटातील दरी आणखीनच वाढली आहे. तसंच यावेळी अजित पवार यांनी आपला पक्ष बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं सांगत शरद पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांना खुलं आव्हान दिलं. अजित पवार यांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याच्या अजित पवारांच्या घोषणेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, "संसदीय लोकशाहीत कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे बारामती मतदारसंघ असेल किंवा अन्य मतदारसंघातही इतर पक्षांना, इतर घटकांना आपला विचार जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली, तर तक्रार करण्याचं कारण नाही. शेवटी लोकांसमोर जाऊन भूमिका मांडायची असते आणि त्याबद्दल लोक जो निर्णय घेतील, तो स्वीकारायचा असतो."

वैयक्तिक हल्ल्यावर काय म्हणाले पवार?

अजित पवार गटाच्या कालच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यावरही पवारांनी आज भाष्य केलं आहे."मी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसोबत मागील ६० वर्षांपासून काम करत आहे. वैयक्तिक हल्ले, टीका-टिपण्णी याची सवय मला आहे. पण ही टीका किती योग्य आहे, ती कोण करतंय, ती योग्य आहे की नाही, हे लोक ठरवत असतात. त्यामुळे कुठूनही असे हल्ले झाले तरी हरकत नाही," असं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले होते अजित पवार?

"लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार मतदारसंघात आपण निवडणूक लढवणारच आहोत. पण त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथं खासदार आहेत, त्यातील काही जागा आपल्याला मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत," असं अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय?

बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी दिलेल्या आव्हानावर बोलताना म्हटलं की, "मी लोकशाहीवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी महाराष्ट्रातील आणि भारतातील नागरिक आहे. लोकशाहीत एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे, हा त्यांचा अधिकार आहे," असं सु्प्रिया सुळेंनी म्हटलं आहे. कुटुंबातील एक व्यक्ती बारामतीसारख्या जागेवर जिथं तुम्ही खासदार आहात, तिथं आमचा पक्षही निवडणूक लढवणार आहे, असं म्हणतो त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या की, "आमची नाती आणि आमचं प्रोफेशन वेगळं आहे. या दोन्हीमध्ये कधीच गल्लत करायची नसते. लोकशाहीत कोणीतरी माझ्याविरोधात लढणारच. त्यामध्ये गैर काय? कोणीतरी लढलंच पाहिजे, असा माझा आग्रह राहणार आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे. कोण योग्य आहे, हे बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता ठरवेन."

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामती