‘डीटीएड’चे आव्हान
By Admin | Updated: June 4, 2014 01:08 IST2014-06-04T01:08:51+5:302014-06-04T01:08:51+5:30
गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांचा दुष्काळ झेलणार्या ‘डीटीएड’ (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसमोर यंदादेखील मोठे आव्हान आहे. जास्तीत जास्त प्रमाणात

‘डीटीएड’चे आव्हान
महाविद्यालयांसमोर संकट : १६ जूनपर्यंत अर्ज विक्री
नागपूर : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांचा दुष्काळ झेलणार्या ‘डीटीएड’ (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसमोर यंदादेखील मोठे आव्हान आहे. जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांंचे प्रवेश व्हावे यासाठी महाविद्यालयांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जर यंदादेखील विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी संख्येने झाले तर निश्चितपणे महाविद्यालयांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागात ‘डीटीएड’ अभ्यासक्रमाच्या जवळपास १0 हजार जागा आहेत. यात एकट्या नागपुरातच सव्वाचार हजार जागा आहेत. २0१३-१४ या मागील वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान फारच कमी विद्यार्थ्यांंनी अर्ज दाखल केले होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदेतर्फे उशिरा सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेवर याचे खापर फोडण्यात आले होते.
यंदा मात्र विद्यार्थी दुसर्या अभ्यासक्रमांकडे वळू नयेत याकरिता परिषदेकडून प्रवेशप्रक्रिया २ जूनपासूनच सुरू करण्यात आली आहे. अगोदर प्रवेशाचे अर्ज केवळ जिल्हा प्रशिक्षण संस्थांमध्येच मिळायचे. परंतु यंदा मात्र सर्वच ‘डीटीएड’ महाविद्यालयांना अर्ज विक्रीची सूट देण्यात आली आहे.
अशी स्थिती असली तरी संस्थाचालकांना प्रवेशाची चिंता सतावते आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळण्याची हमी नाही. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून दोन वर्षांंचा अभ्यासक्रम करण्याऐवजी विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत. (प्रतिनिधी)
‘बम्पर’ निकालाने जागविल्या आशा
दरम्यान, बारावीचा ‘रेकॉर्डब्रेक’ निकाल लागल्याने संस्थाचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील वर्षीपेक्षा जवळपास १६ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांंना प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांनी कंबर कसली आहे. यंदा नक्कीच जास्त प्रमाणात प्रवेश होण्याची आशा आहे. परंतु विद्यार्थ्यांंना महाविद्यालयांपर्यंंत आणण्याची महाविद्यालयांत स्पर्धा राहणार आहे.