शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:42 IST

कोल्हापुरात कसबा बावड्यातील हुंकार मेळाव्यात घोषणा

कसबा बावडा: राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यभर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे केली.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कसबा बावड्यातील श्री मंगल कार्यालयात हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग बांधवांसह महिला, शेतकरी यांची मोठी उपस्थिती होती.राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले. पायी यात्रा काढली. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने घेण्यात आला असल्याचे सांगून बच्चू कडू म्हणाले, शेतीमालाला चांगला भाव भेटत नाही. जर शेतीमालाला चांगला भाव भेटला तर देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही. मग शेतकरी सरकारकडे कर्जमाफी करा म्हणून कधीच मागणी करणार नाही. पण शेतमालाला चांगला भाव मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे.दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले अपंगांना आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते, याच्यासारखे दुर्दैव काय? असा प्रश्न करून ते म्हणाले सरकारने दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ती आता अडीच हजार रुपये केली आहे. ही संघटनेने दाखविलेल्या ताकदीचे यश आहे. अजूनही आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी आपणास रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे.प्रारंभी जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समाधान हेगडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.