शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

उद्धव ठाकरेंना 'खुर्ची' महत्वाची; शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेलं नाही : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 5:14 PM

कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा ट्रॅक्टर पूजन व सन्मान रॅली 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ़क्त खुर्ची महत्वाची आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे. अशी टीका प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. 

   दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या तीन कृषी कायद्याचे स्वागत बळीराजा सन्मान, ट्रक्टर पूजन व रॅली काढून करण्यात आले. पुढे या रॅलीचे चौफुला येथे सभेत रुपांतर झाले. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे यावेळी उपस्थित होते.   

पाटील म्हणाले, राहुल गांधींनी ट्रक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय हेच समजत नाही. शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांच्या ट्रॅक्टर, नांगर हे शेतकऱ्यांच्या जीवनाचे साधनं आहेत. हे ते विसरले. या विधेयकांना पाठिंबा देत असून गांधींना इशारा देतोय की शेतकरी विधेयकांना विरोध करू नका. काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. अशी कायद्याला स्थगिती देता येत नाही. मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिता का देत आहेत?  कृषि उत्पन बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचे काम आहे. सेस बंद होणार असल्यानेच यांच्या पोटात दुखत आहे. सेस गोळा करणे बापाची पेंड आहे काय.  शेतकऱ्यांना फायदेशीर असणाऱ्या कायद्यांना विरोध करून शेतकरी गरीब राहिला पाहिजे अशी त्यांचा धारणा आहे. 

या कायद्याच्या प्रसारासाठी शिवार सभा घेणार असून पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचे आणि आभाराचे पत्र लिहून घेणार आहोत. असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलagricultureशेतीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकार