शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मध्य रेल्वेवर आजपासून धावणार ४३१ फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 03:26 IST

दोन महिला स्पेशल; प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त आठ फेऱ्यांचे नियोेजन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यस्थितीत केवळ अत्यावश्क सेवेतील कर्मचाºयांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावरून रोज ४२३ फेºया होता. प्रवाशांची सुरक्षा आणि सोयीसाठी १ आॅक्टोबरपासून अतिरिक्त आठ फेºया वाढविण्यात आल्या आहेत.या अतिरिक्त ८ फेºयांमध्ये २ महिला स्पेशल गाड्यांसह मुख्य मार्गावर ४ विशेष आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ४ विशेष गाड्या चालविण्यात येतील.मध्य रेल्वे मार्गावर कल्याण येथून ४ गाड्या (२ डाऊन व २ अप) धावतील. यामध्ये १ अप महिला विशेष कल्याण येथून सकाळी ०८.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०९.३४ वाजता पोहोचेल. तर १ डाऊन महिला विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.३५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे १९.४४ वाजता पोहोचेल.

डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४५ वाजता सुटेल व कल्याणला १०.५० वाजता पोहोचेल. अप विशेष १६.१० वाजता कल्याण येथून सुटेल आणि १७.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष लोकल फक्त भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील. तर ट्रान्स हार्बर मार्गावरून ४ गाड्या धावतील. (२ डाऊन व २ अप) ठाण्याहून पनवेलला जाण्यासाठी तसेच येण्यासाठी असतील. पनवेल विशेष ठाणे येथून ०९.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०९.५२ वाजता पोहोचेल. पनवेल विशेष ठाणे येथून १८.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे १९.२४ वाजता पोहोचेल. ठाणे विशेष पनवेल येथून ०७.५५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०८.५० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष पनवेल येथून १७.२० वाजता सुटेल आणि ठाणे येथे १८.१५ वाजता पोहोचेल. ही विशेष जलद असेल आणि फक्त रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर येथे थांबेल.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबई