शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

केंद्र सरकारनेच मराठा आरक्षण द्यावे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:10 IST

मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात शिक्षणामध्ये किमान १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये किमान १२ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, त्यासाठी कायदा करण्याची गळ घालण्यात आली आहे.

 मुंबई : आरक्षण देणे, हा सर्वस्वी केंद्र सरकारचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने आता राष्ट्रपती व केंद्र सरकारने त्यादृष्टीने तातडीने पावले उचलावीत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी राजभवनवर दिले. तसेच ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्याबाबत मंगळवारीच पत्र पाठविले.  मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात शिक्षणामध्ये किमान १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये किमान १२ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, त्यासाठी कायदा करण्याची गळ घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत आता केंद्र सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका ठाकरे सरकारने या निवेदनात घेतली आहे.मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यपालांना सांगितले की, सर्व पक्षांनी सहमतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय मागास आयोगाचा व राष्ट्रपती महोदयांचा अधिकार असल्याचे निकालात नमूद केले आहे. त्यामुळे राज्याचे पालक म्हणून राज्यपाल महोदयांनी केंद्र शासनाकडे तसेच राष्ट्रपतींकडे या प्रश्नी राज्याची बाजू मांडावी.राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, मराठा आरक्षणासाठी आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू. आज राज्यपालांना भेटून आम्ही पहिले पाऊल टाकले आहे. आमच्या भावना राष्ट्रपती व केंद्र सरकारकडे तातडीने कळविण्याचे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नसला तरी समाजाच्या भावना केंद्र सरकारने समजून घेत आरक्षण द्यावे. पाच पानांच्या निवेदनात मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी व गरज याविषयी नमूद केले आहे.मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आरक्षणाचा हा प्रश्न फक्त एका राज्याचा विषय नाही. तर देशातील अनेक राज्यांचा प्रश्न आहे. राज्यांचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब  थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश होता.

अधिकार आमचाच पण...घटनेच्या १०२व्या दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार राज्यालाचआहे, अशी आमची आजही भूमिका आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार केंद्राचा असल्याचे म्हटले असल्याने राज्याची भूमिका निरर्थक ठरते आणि हा अधिकार केंद्राच्या अखत्यारित जातो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निकालाच्या समीक्षेसाठी समिती- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाची समीक्षा करण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी एक समिती नियुक्त केली. अलाहाबाद उच्च न्यायाालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले हे समितीचे अध्यक्ष असतील. - समितीमध्ये अ‍ॅड. रफिक दादा, अ‍ॅड. दरायस खंबाटा, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुधीर ठाकरे, विधी व न्याय विभागाचे निवृत्त सचिव संजय देशमुख, सचिव भूपेंद्र गुरव, अ‍ॅड. आशिष राजे गायकवाड हे सदस्य असतील. या निर्णयासंदर्भात शासनाने कुठली पावले उचलावीत, याबाबत समिती शासनाला मार्गदर्शन करेल. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार