शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी केंद्र सरकार सरसावले, डेहराडूनमध्ये संशोधन कार्यशाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 18:52 IST

ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील.

- गणेश वासनिक

अमरावती : ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या नियंत्रणात डेहराडून येथे १९ व २० सप्टेंबर रोजी तज्ज्ञांची संशोधन कार्यशाळा होणार आहे.वाघ, बिबट्याची वाढत असलेली संख्या ही राज्याच्या वनविभागासाठी आनंददायी आहे. परंतु, जंगली श्वापदांचा अधिवासच मानवाने नष्ट केल्यामुळे ग्रामीण भागात मानव-वन्यजीव संघर्ष ही मोठी समस्या उभी झाली आहे. वाघांचे अधिवास सुरक्षित ठेवताना जंगलाचे संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. विदर्भात पाच व्याघ्र प्रकल्प असले तरी या व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त जंगलातसुद्धा वाघांचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित आहे. त्यामुळे वाघांचे कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्यासाठी वार्षिक संशोधन कार्यशाळेत मंथन केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील तज्ज्ञ वार्षिक संशोधन कार्यशाळेत उपस्थिती दर्शविणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, वनविभाग आणि डेहराडून येथील वन्यजीव विभागाकडे कार्यशाळेचे नियंत्रण असणार आहे. राज्यात मार्च २०१८ अखेर १२ बिबट्यांची अवैधरित्या शिकार झाली असून, डब्ल्यूपीएसआयच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. प्राणी, वृक्षसंवर्धन याविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम डब्ल्यूपीएसआय ही संस्था करते. या संस्थेने जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानुसार बिबट्यांचा आढावा घेतला. यात उत्तराखंडमध्ये सर्वाधिक ३६ बिबटे मृत्युमुखी पडले. या आकडेवारीत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर असून, ३१ बिबटे मृत्युमूखी पडले आहेत. अवैधरित्या शिकार करून मारलेल्या बिबट्यांची संख्या महाराष्ट्रात १२ आहे. वाघ, बिबट या हिंस्त्र प्राण्यांच्या दिवसेदिवस मानवी परिसरात वाढत असलेला वावर धोकादायक ठरत आहे. परिणामी केंद्र सरकारने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, जंगलावर मानवाने अवलंबून न राहता उपजीविकेचे साधन निर्माण करणे, वन्यप्राण्यांसह मनुष्याचे जीवाचे संरक्षण आदी विषयावर संशोधन कार्यशाळेत तज्ञ्ज मते नोंदविणार असून, त्याअनुषंगाने उपाययोजना के ल्या जातील.

२२ हजार चौरस कि.मी. जंगल संरक्षणाचा कृतिआराखडाविदर्भात मेळघाट वगळता नागझिरा, पेंच, ताडोबा, बोर व टिपेश्वर हे पाच व्याघ्र प्रकल्प आहेत. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली असे एकूण सात जिल्हे मिळून २२ हजार चौरस कि.मी. लांब असलेले जंगल संरक्षणासाठी कृतीआराखडा तयार केला जाणार आहे. वाघांचे कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वनविभागाला सांभाळावी लागणार आहे, शिवाय मानव- वन्यप्राणी संघर्ष होता कामा नये, ही खबरदारी घ्यावी लागेल. 

जंगली श्वापदांचे मणुष्यांवर होणारे जीवघेणी हल्ले हे गंभीर आहेत. मात्र, जंगल असेल, तर वन्यप्राणी जगतील. त्यामुळे जंगल, वन्यप्राण्यांसह मनुष्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केला जात आहे. डेहरादून येथील संशोधन कार्यशाळेत या विषयावर शिक्कामोर्तब होईल.        - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव