२0१२ मधील गारपीट व पूरग्रस्तांना केंद्राचा मदतीचा हात
By Admin | Updated: August 21, 2014 00:16 IST2014-08-20T21:57:13+5:302014-08-21T00:16:49+5:30
राज्यात जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती आणि फळ पिकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.

२0१२ मधील गारपीट व पूरग्रस्तांना केंद्राचा मदतीचा हात
खामगाव: राज्यात जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत गारपीट व पूरपरिस्थितीमुळे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती आणि फळ पिकांसाठी केंद्र शासनाच्या एसडीआरएफ,एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत तातडीने वितरीत झाल्यास सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना ती मोलाची ठरणार आहे.
जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत झालेल्या गारपीट आणि पुरामुळे राज्यातील सुमारे २३ हजार ६0४.0६ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे तसेच फळपिकाचे नुकसान झाले होते. यामध्ये ७४१.८४ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश होता. त्यामुळे या नुकसानीपोटी केंद्र शासनाच्या एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषानुसार मदत वाटप करण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांना कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ३ हजार रूपये, सिंचनखालील पिकांसाठी प्रति हेक्टरी ६ हजार रुपये याप्रमाणे १ हेक्टरच्या र्मयादेत केंद्र शासनाची मदत मिळणार आहे. मदतीची कमीत कमी रक्कम ५00 रुपये एवढी राहणार आहे. फळपिके वा बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी ८ हजार रुपये याप्रमाणे १ हेक्टरच्या र्मयादेत मिळणार असून, मदतीची कमीतकमी रक्कम १ हजार रुपये राहणार आहे. अन्य शेतकर्यांसाठी कोरडवाहू क्षेत्राखालील नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रतिहेक्टरी ३ हजार रुपये, आश्वासित जलसिंचन क्षेत्राखालील नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रति हेक्टरी ६ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानापोटी १ हेक्टरच्या र्मयादेत प्रति हेक्टरी ८ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे. मदत वाटप कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.
** कृषी विभागाला सूचना
ही मदत संबंधित खातेदारांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. यातून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. निधी मिळाल्यानंतर विशेष मोहिम आखून मार्च २0१५ पूर्वी मदत वाटप करावी, असे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.
** नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्या शेतकर्यांना, व्यक्तींना केंद्र शासनाच्या एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार गारपीट, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, आग, त्सुनामी, भूस्खलन, ढगफुटी, टोळधाड व अतिथंडी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी मदत दिली जाते.
** जानेवारी ते डिसेंबर दरम्यान गारपीट व पुरामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे कृषी विभागामार्फ त करण्यात आला होता. त्यानंतर याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता; मात्र ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांनाच मदत द्यावी, असा निकष ठरल्याने अनेक जिल्ह्यातील शेतकरी या मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.