शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शिवजयंती साधेपणाने साजरा करा, मिरवणूक काढू नका; राज्य सरकारच्या 'या' सूचना वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:27 IST

तिथीनुसार शिवजयंतीसाठी शुक्रवारी शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.

मुंबई :  शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी साधेपणाने साजरी केल्यानंतर आता ३१ मार्च रोजी असणारी तिथीनुसार शिवजयंतीदेखील साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

तिथीनुसार शिवजयंतीसाठी शुक्रवारी शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यासाठी सर्व सण, उत्सव तसेच कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तिथीनुसार शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी येणारी शिवजयंती सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ १०० जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणांहून अनेक शिवप्रेमी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला व इतर गडांवर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता किल्ल्यांवर एकत्र न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या पोवाडे, मर्दानी खेळ, व्याख्यान, गाणे, नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी या सर्वांचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुकांवरदेखील बंदी घालण्यात आली असून, केवळ १०० जणांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भासणारा रक्ताचा तुटवडा तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठिकठिकाणी रक्तदान शिबिर व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यासाठी सर्व सण, उत्सव तसेच कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तिथीनुसार शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस