शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 17:10 IST

नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयात केले. 

मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयात केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्यावर्षी कमी फटाके वाजले. मुंबईसह राज्याचे प्रदूषण कमी झाले होते. यामध्ये शालेय मुलांनी मोठा सहभाग घेतला होता. अलिकडे मुलांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाली आहे. ते स्वत: आपले आई वडील, नातेवाईक आणि मित्रांना कमी आवाजाचे फटाके वाजवा म्हणून सांगतात. याही वर्षी मुलांनी आणि पालकांनी कमी आवाजाचे फटाके वाजवून पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी. आपल्या राज्यात प्लास्टिक बंदीची मोहीम राज्यभर सुरु आहे. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. ध्वनीप्रदूषण, फटाके मुक्त दिवाळी आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्याने काम करीत आहे. या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, राज्यातील काही भागात आणि मुंबई शहरात हवा प्रदूषित झाली आहे. त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपल्याकडे साजरे होणारे सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले तर हवा प्रदूषित होणार नाही. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होणार नाही. येणारी दिवाळी आपण सर्वांनी फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त साजरी करावी. लहान मुलांनी तर फटाकेच वाजवू नयेत. जर वाजवायचे असतील तर कमी आवाजाचे वाजवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

याच कार्यक्रमात दिव्यांग (अंध) मुलांनी तयार केलेल्या भारतातील पहिल्या ब्रेल लिपीतील दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच फटाके मुक्त, प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित मुलांना आणि नागरिकांना दिली.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई-रविंद्रन यांनी केले. त्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबतच्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रDiwaliदिवाळी