शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे

By admin | Updated: September 19, 2015 04:51 IST

मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार आणि मुंबई पोलिसांवर उलटसुलट आरोप होत असल्यानेच सीबीआयच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे. शीना बोराच्या खुनामागे अर्थकारण असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले असल्याने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी पत्रपरिषदेत दिली. बक्षी यांनी सांगितले, की या प्रकरणासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडून गृह विभागाने अहवाल मागविला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा अहवाल आज दुपारी आपल्याकडे दिला. त्यात दयाळ यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशीला मान्यता दिली. आपण केंद्रीय गृह मंत्रालय आणि सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला आहे. शीना बोरा हत्येचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली. या बदलीवरून मीडियातून टीका होताच तपास मारिया यांच्याकडेच राहील, असे बक्षी यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मारिया हा तपास करण्यास इच्छुक नसल्याच्या बातम्या आल्या. आता नेमकी काय स्थिती आहे, असे विचारले असता बक्षी म्हणाले की, मारिया यांच्याशी गृहविभागाने कुठलीही चर्चा केली नाही. तसेच, मारिया यांनीदेखील कुठलीच विचारणा तपासाबाबत केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलीसच तपास करीत आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.सीबीआयकडे तपास देणे म्हणजे मुंबई पोलिसांवर सरकारचा अविश्वास असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून ते सीबीआयला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआय त्यास संमती देते की नाही हे लवकरच ठरेल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)सीबीआय का?शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास जवळपास आटोपला आहे. आरोपी अटकेत आहेत. लगेच आणखी काही जणांना अटक केली जाणार नाही. असे असताना तपास सीबीआयकडे देण्यात आला, यावर मुंबई पोलिसांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आर्थिक बाबींच्या तपासासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे सरकारचे म्हणणे असले तरी हे कारण तितके पटणारे नाही. कारण आर्थिक बाबींच्या अन्वेषणासाठी सक्तवसुली संचालनालय आहे, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. माध्यमांवर आरोप..शीना बोरा हत्या प्रकरण सरकारने कधीही ‘हाय प्रोफाईल’ केलेले नव्हते; ते मीडियाने केले, असा आरोप के.पी. बक्षी यांनी केला. तपासात स्थानिक अधिकारी नकोत!शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे सुुपुर्द करण्याचा निर्णय घेऊन सरकारने मुंबई पोलिसांना तपासातून बाजूला केले आहेच. शिवाय, सीबीआयच्या टीममध्येदेखील स्थानिक पोलीस अधिकारी असणार नाहीत. या केसच्या तपासात मीडियाच्या हाती काही लागू नये, यासाठी कदाचित ही खबरदारी घेतली जात असावी.