शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे

By admin | Updated: September 19, 2015 04:51 IST

मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार आणि मुंबई पोलिसांवर उलटसुलट आरोप होत असल्यानेच सीबीआयच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे. शीना बोराच्या खुनामागे अर्थकारण असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले असल्याने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी पत्रपरिषदेत दिली. बक्षी यांनी सांगितले, की या प्रकरणासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडून गृह विभागाने अहवाल मागविला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा अहवाल आज दुपारी आपल्याकडे दिला. त्यात दयाळ यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशीला मान्यता दिली. आपण केंद्रीय गृह मंत्रालय आणि सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला आहे. शीना बोरा हत्येचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली. या बदलीवरून मीडियातून टीका होताच तपास मारिया यांच्याकडेच राहील, असे बक्षी यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मारिया हा तपास करण्यास इच्छुक नसल्याच्या बातम्या आल्या. आता नेमकी काय स्थिती आहे, असे विचारले असता बक्षी म्हणाले की, मारिया यांच्याशी गृहविभागाने कुठलीही चर्चा केली नाही. तसेच, मारिया यांनीदेखील कुठलीच विचारणा तपासाबाबत केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलीसच तपास करीत आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.सीबीआयकडे तपास देणे म्हणजे मुंबई पोलिसांवर सरकारचा अविश्वास असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून ते सीबीआयला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआय त्यास संमती देते की नाही हे लवकरच ठरेल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)सीबीआय का?शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास जवळपास आटोपला आहे. आरोपी अटकेत आहेत. लगेच आणखी काही जणांना अटक केली जाणार नाही. असे असताना तपास सीबीआयकडे देण्यात आला, यावर मुंबई पोलिसांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आर्थिक बाबींच्या तपासासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे सरकारचे म्हणणे असले तरी हे कारण तितके पटणारे नाही. कारण आर्थिक बाबींच्या अन्वेषणासाठी सक्तवसुली संचालनालय आहे, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. माध्यमांवर आरोप..शीना बोरा हत्या प्रकरण सरकारने कधीही ‘हाय प्रोफाईल’ केलेले नव्हते; ते मीडियाने केले, असा आरोप के.पी. बक्षी यांनी केला. तपासात स्थानिक अधिकारी नकोत!शीना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे सुुपुर्द करण्याचा निर्णय घेऊन सरकारने मुंबई पोलिसांना तपासातून बाजूला केले आहेच. शिवाय, सीबीआयच्या टीममध्येदेखील स्थानिक पोलीस अधिकारी असणार नाहीत. या केसच्या तपासात मीडियाच्या हाती काही लागू नये, यासाठी कदाचित ही खबरदारी घेतली जात असावी.