शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जळीत प्रकरणात पीडित महिलेस राज्यात प्रथमच मिळाला ‘मनोधैर्य’ योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 4:42 AM

महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याच्या हल्ल्यासंदर्भात कुठल्याही योजनेत मदतीची तरतूद नसल्याने हिंगणघाट ...

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याच्या हल्ल्यासंदर्भात कुठल्याही योजनेत मदतीची तरतूद नसल्याने हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडितेस शासनाच्या कुठल्या योजनेतून शासकीय मदत द्यायची हा प्रश्न संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसमोर पडला होता. त्यावर वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तोडगा काढत ‘मनोधैर्य’ योजनेत हिंगणघाट येथील प्रकरणाचा समावेश करून पीडितेस शासकीय मदत मंजूर केली आहे. वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा हा निर्णय राज्यातील प्रथम असून तो इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे विधी तज्ज्ञांनी सांगितले.पीडितेच्या औषधोपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तशा सूचनाही दिल्या. पीडितेला शासकीय मदत देण्यासाठी मनोधैर्य योजनेच्या आठ पानांच्या नियमावलींचा आढावा घेण्यात आला. त्यात केवळ अ‍ॅसिड हल्ल्याचा उल्लेख होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अ‍ॅसिडच्या तुलनेत ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याची दाहकता आणि भीषणता लक्षात आणून दिली. त्यानंतर निर्णय झाला.अवघ्या तीन दिवसांत मदत मंजूर४ फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे प्रस्ताव येताच तीन दिवसांत पीडितेला शासकीय मदत मंजूर झाली. ती सोमवारपर्यंत पीडितेच्या वडिलांच्या बँक खात्यात जमा होईल.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप ग. मुरूमकर यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या इतर योजनांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानंतर मनोधैर्य योजनेतून पीडितेसाठी शासकीय मदत मंजूर करण्यात आली आहे. सात दिवसांची कालमर्यादा असताना प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सर्व बाजू तपासून अवघ्या तीन दिवसांत प्रकरण मंजूर करण्यात आले.- निशांत परमा,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा.