कारंजातील संचारबंदी हटविली

By Admin | Updated: July 22, 2015 23:29 IST2015-07-22T23:29:37+5:302015-07-22T23:29:37+5:30

१४ जुलैपासून लागू संचारबंदी २२ जुलै रोजी पुर्णत: उठविण्यात आली.

Carnation curtains were deleted | कारंजातील संचारबंदी हटविली

कारंजातील संचारबंदी हटविली

कारंजा लाड (जि. वाशिम): छेडखानीच्या वादातून शहरात लागलेल्या संचारबंदीमुळे जनजिवन प्रभावित झाले होते. जिल्हा प्रशासनाने शहरात १४ जुलैपासून लागू केलेली संचारबंदी २२ जुलै रोजी पुर्णत: उठविण्यात आली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधिात राहावी याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, संचारबंदी पूर्णवेळ शिथिल करण्यात आल्याने शहरवासींचे जनजीवन पूर्वपदावर आले असून दि. २२ पासून शहरातील शाळा व महाविद्यालयही विद्याथ्यार्थीनी गजबजलेले होते.

Web Title: Carnation curtains were deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.