शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Maharashtra New Governor: मोदी सांगतील तिथे...! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कॅप्टन अमरिंदर सिंग? काय म्हणाले पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 21:44 IST

Maharashtra Politics: शिवाजी महाराज वक्तव्य प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती.

महाराष्ट्रातील वादात सापडलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त व्हायचे असल्याचे कळविले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून ते वादात सापडले होते. त्यांना हटविण्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी बंद पाळला होता. अगदी उदयनराजे, संभाजीराजे यांनी देखील मोहिम सुरु केली होती. असे असताना प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती. परंतू, त्यालाही बरेच दिवस झाले आहेत. केंद्रातून काही हालचाली दिसत नाहीएत. अशातच राज्याचे नवे राज्यपाल कोण असतील यावरून नावांची चर्चा सुरु झाली आहे. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील असे बोलले जात आहे. असे असताना अमरिंदर सिंग यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

s

महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्याच्या सर्व शक्यतांवर सिंग यांनी त्या अफवा आहेत असे सांगितले. मला याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत माझ्याशी कोणीही बोलले नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे. मी मोदींना जेव्हा भेटलेलो तेव्हा त्यांना मी तुमच्यासोबत असल्याचे म्हणालो होतो. ते जिथे सांगतील तिथे मी जाण्यास तयार आहे, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा