शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Maharashtra New Governor: मोदी सांगतील तिथे...! महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कॅप्टन अमरिंदर सिंग? काय म्हणाले पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 21:44 IST

Maharashtra Politics: शिवाजी महाराज वक्तव्य प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती.

महाराष्ट्रातील वादात सापडलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त व्हायचे असल्याचे कळविले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून ते वादात सापडले होते. त्यांना हटविण्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी बंद पाळला होता. अगदी उदयनराजे, संभाजीराजे यांनी देखील मोहिम सुरु केली होती. असे असताना प्रकरण निवळल्यानंतर कोश्यारी यांनी मोदींनाच पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता महाराष्ट्रातील राज्यपाल बदलले जाणार अशी अटकळ होती. परंतू, त्यालाही बरेच दिवस झाले आहेत. केंद्रातून काही हालचाली दिसत नाहीएत. अशातच राज्याचे नवे राज्यपाल कोण असतील यावरून नावांची चर्चा सुरु झाली आहे. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील असे बोलले जात आहे. असे असताना अमरिंदर सिंग यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

s

महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्याच्या सर्व शक्यतांवर सिंग यांनी त्या अफवा आहेत असे सांगितले. मला याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत माझ्याशी कोणीही बोलले नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे. मी मोदींना जेव्हा भेटलेलो तेव्हा त्यांना मी तुमच्यासोबत असल्याचे म्हणालो होतो. ते जिथे सांगतील तिथे मी जाण्यास तयार आहे, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा