शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 03:49 IST

पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबत खूप मागे

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी २७ मार्च २०१५ रोजी औरंगाबादलापर्यटन राजधानीचा दर्जा देऊन पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले खरे, मात्र आजही हे शहर पायाभूत सुविधा, पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबतची वानवा यांच्याशी झुंज देत असून, पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे पर्यटन राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता औरंगाबाद एक परिपूर्ण पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.औरंगाबादमध्ये पर्यटकांच्या सुविधांची वानवा जाणवत असून, बहुसंख्य पर्यटक येथे राहणे पसंत करीत नाहीत. जोपर्यंत पर्यटक येथे रमणार नाहीत तोपर्यंत पर्यटनावर आधारित इतर उद्योग येथे बहरणार नाहीत. म्हणूनच केवळ पर्यटन राजधानी म्हणून विकास करण्यापेक्षा पर्यटन केंद्र म्हणून शहर आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास होण्यासाठी शहरात एमआयडीसी, डीएमआयसी यासारखी औद्योगिक क्षेत्रे उभी राहिली. याच धर्तीवर पर्यटन केंद्र किंवा राजधानी म्हणून शहराचा विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.देश-विदेशातील पर्यटकांना अजिंठा-वेरूळ लेण्यांसह शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळांचे देखील आकर्षण आहे; परंतु या वास्तू किंवा स्थळांची पुरेशी माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. यामुळे बहुतांश पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी आणि मकबरा पाहून निघून जातात. आता तर मनपातर्फे रेल्वेस्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्रालाही कायमचे टाळे लागले आहे, तसेच एमटीडीसीचे अधिकृत संकेतस्थळही विविध बदलांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात कुचकामी ठरते.सुविधांची वानवाशहरात उत्तम दर्जाचे बाग-बगीचे, पर्यटकांच्या दृष्टीने निर्माण झालेली बाजारपेठ, बालकांसाठी करमणुकीची ठिकाणे, कला दालने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमित होणारे आयोजन, शहरातील पर्यटन स्थळांना एका शृंखलेत जोडणारी बसव्यवस्था, तसेच दिवसभर पर्यटन करून परतल्यावर वेळ घालविण्यासाठी एखादे रम्य ठिकाण या सुविधा कोणत्याही पर्यटकांना हव्या असतात. त्यामुळे या सुविधा तर शहरात निर्माण कराव्यातच; पण यासोबतच या सर्व सोयीसुविधांची बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये योग्य प्रमाणात प्रसिद्धी होऊन तेथील पर्यटक कसे शहरात येतील, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन