शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 03:49 IST

पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबत खूप मागे

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी २७ मार्च २०१५ रोजी औरंगाबादलापर्यटन राजधानीचा दर्जा देऊन पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले खरे, मात्र आजही हे शहर पायाभूत सुविधा, पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबतची वानवा यांच्याशी झुंज देत असून, पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे पर्यटन राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता औरंगाबाद एक परिपूर्ण पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.औरंगाबादमध्ये पर्यटकांच्या सुविधांची वानवा जाणवत असून, बहुसंख्य पर्यटक येथे राहणे पसंत करीत नाहीत. जोपर्यंत पर्यटक येथे रमणार नाहीत तोपर्यंत पर्यटनावर आधारित इतर उद्योग येथे बहरणार नाहीत. म्हणूनच केवळ पर्यटन राजधानी म्हणून विकास करण्यापेक्षा पर्यटन केंद्र म्हणून शहर आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास होण्यासाठी शहरात एमआयडीसी, डीएमआयसी यासारखी औद्योगिक क्षेत्रे उभी राहिली. याच धर्तीवर पर्यटन केंद्र किंवा राजधानी म्हणून शहराचा विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.देश-विदेशातील पर्यटकांना अजिंठा-वेरूळ लेण्यांसह शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळांचे देखील आकर्षण आहे; परंतु या वास्तू किंवा स्थळांची पुरेशी माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. यामुळे बहुतांश पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी आणि मकबरा पाहून निघून जातात. आता तर मनपातर्फे रेल्वेस्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्रालाही कायमचे टाळे लागले आहे, तसेच एमटीडीसीचे अधिकृत संकेतस्थळही विविध बदलांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात कुचकामी ठरते.सुविधांची वानवाशहरात उत्तम दर्जाचे बाग-बगीचे, पर्यटकांच्या दृष्टीने निर्माण झालेली बाजारपेठ, बालकांसाठी करमणुकीची ठिकाणे, कला दालने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमित होणारे आयोजन, शहरातील पर्यटन स्थळांना एका शृंखलेत जोडणारी बसव्यवस्था, तसेच दिवसभर पर्यटन करून परतल्यावर वेळ घालविण्यासाठी एखादे रम्य ठिकाण या सुविधा कोणत्याही पर्यटकांना हव्या असतात. त्यामुळे या सुविधा तर शहरात निर्माण कराव्यातच; पण यासोबतच या सर्व सोयीसुविधांची बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये योग्य प्रमाणात प्रसिद्धी होऊन तेथील पर्यटक कसे शहरात येतील, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन