शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पर्यटनाची राजधानी नावालाच; औरंगाबादची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 03:49 IST

पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबत खूप मागे

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी २७ मार्च २०१५ रोजी औरंगाबादलापर्यटन राजधानीचा दर्जा देऊन पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले खरे, मात्र आजही हे शहर पायाभूत सुविधा, पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीबाबतची वानवा यांच्याशी झुंज देत असून, पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे पर्यटन राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता औरंगाबाद एक परिपूर्ण पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.औरंगाबादमध्ये पर्यटकांच्या सुविधांची वानवा जाणवत असून, बहुसंख्य पर्यटक येथे राहणे पसंत करीत नाहीत. जोपर्यंत पर्यटक येथे रमणार नाहीत तोपर्यंत पर्यटनावर आधारित इतर उद्योग येथे बहरणार नाहीत. म्हणूनच केवळ पर्यटन राजधानी म्हणून विकास करण्यापेक्षा पर्यटन केंद्र म्हणून शहर आकर्षक बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास होण्यासाठी शहरात एमआयडीसी, डीएमआयसी यासारखी औद्योगिक क्षेत्रे उभी राहिली. याच धर्तीवर पर्यटन केंद्र किंवा राजधानी म्हणून शहराचा विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.देश-विदेशातील पर्यटकांना अजिंठा-वेरूळ लेण्यांसह शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळांचे देखील आकर्षण आहे; परंतु या वास्तू किंवा स्थळांची पुरेशी माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. यामुळे बहुतांश पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी आणि मकबरा पाहून निघून जातात. आता तर मनपातर्फे रेल्वेस्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्रालाही कायमचे टाळे लागले आहे, तसेच एमटीडीसीचे अधिकृत संकेतस्थळही विविध बदलांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात कुचकामी ठरते.सुविधांची वानवाशहरात उत्तम दर्जाचे बाग-बगीचे, पर्यटकांच्या दृष्टीने निर्माण झालेली बाजारपेठ, बालकांसाठी करमणुकीची ठिकाणे, कला दालने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियमित होणारे आयोजन, शहरातील पर्यटन स्थळांना एका शृंखलेत जोडणारी बसव्यवस्था, तसेच दिवसभर पर्यटन करून परतल्यावर वेळ घालविण्यासाठी एखादे रम्य ठिकाण या सुविधा कोणत्याही पर्यटकांना हव्या असतात. त्यामुळे या सुविधा तर शहरात निर्माण कराव्यातच; पण यासोबतच या सर्व सोयीसुविधांची बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये योग्य प्रमाणात प्रसिद्धी होऊन तेथील पर्यटक कसे शहरात येतील, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन