शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आमची अवस्था ग्रामपंचायत सदस्यासारखी; बच्चू कडूंनी मांडलं दुःख, 'ठाकरे सरकार'मध्ये बेबनाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 13:00 IST

'विधानसभेत कमीत कमी बोलता तरी येत होतं. आता तर बोलताही येत नाही. कामं करण्यासाठी जो अधिकार मिळायला पाहिजे, तो मिळायलाच पाहिजे.'

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सारं काही आलबेल नसल्याचं एका पत्रावरून उघड झालं आहे.कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नाही, आम्हाला सातत्याने डावललं जातं, अशी तक्रार राज्यमंत्र्यांनी केली आहे.मान आमच्या विभागाचा प्रस्ताव असेल तेव्हा तरी कॅबिनेटला बोलवावं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केलीय.

मुंबईः राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटपावरून निर्माण झालेली नाराजी आता दूर झाल्याचं दिसत असलं तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सारं काही आलबेल नसल्याचं एका पत्रावरून उघड झालं आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नसल्याची, सातत्यानं डावलत असल्याची तक्रार दहापैकी सहा राज्यमंत्र्यांनी केल्याचं सूत्रांकडून समजतंय. या नाराज राज्यमंत्र्यांची व्यथा बच्चू कडू यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये बोलून दाखवली आहे. 

वास्तविक, कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्री हा वाद तसा नवा नाही. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा अनेक सरकारांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. यावेळी, अब्दुल सत्तार, अदिती तटकरे, दत्ता भरणे, बच्चू कडू यांच्यासह सहा राज्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपापल्या कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध तक्रार केल्याचं कळतं. कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नाही, आम्हाला सातत्याने डावललं जातं, आढावा बैठकांमध्ये काय होतं हे सांगितलंच जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. या तक्रारीची दखल घेऊन, अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्र्यांना समज दिली होती, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. उलट, राज्यमंत्र्यांचं दुःख वेगळ्या कारणासाठी असल्याची खोचक आणि सूचक चर्चा कॅबिनेट मंत्र्यांच्या वर्तुळात ऐकू येते.

 

'आमच्या खात्याचे निर्णय वर्तमानपत्रांतून कळतात!'

कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्री या बेबनावाबाबत जलसंपदा, शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता, आपली अवस्था ग्रामपंचायत सदस्यासारखी असल्याची मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. 

बच्चू कडू म्हणाले, 'विधानसभेत कमीत कमी बोलता तरी येत होतं. आता तर बोलताही येत नाही. कॅबिनेटमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. ग्रामपंचायत सदस्य निवडून येतो, पण त्याला मीटिंगमध्ये बसता येत नाही तशीच आमची अवस्था झालीय. किमान आमच्या विभागाचा प्रस्ताव असेल तेव्हा तरी कॅबिनेटला बोलवावं, अशी आमची अपेक्षा आहे. कारण आज, कॅबिनेटमध्ये आमच्या खात्याशी संबंधी झालेला निर्णय आम्हाला पेपरमधून कळतो, हे दुर्दैवी आहे. त्यात दुरुस्ती केली पाहिजे.' 

एखादा चुकीचा निर्णय झाला, तर राज्यमंत्री म्हणून लोक आम्हाला विचारतात. पण तो आम्ही घेतलेलाच नसतो. त्यामुळे एक तर आम्हाला मत विचारा किंवा हा निर्णय राज्यमंत्री सोडून कॅबिनेटचा निर्णय असल्याचं जाहीर करा, असंही त्यांनी नमूद केलं. 

'उद्धव ठाकरेंवर विश्वास'

हे आघाडीचं सरकार आहे. गाडी रुळावर यायला वेळ लागेल. पण, कामं करण्यासाठी जो अधिकार मिळायला पाहिजे, तो मिळायलाच पाहिजे. खासगी कामांसाठी अधिकार नसतील तरी चालेल, पण सार्वजनिक कामं, धोरणात्मक निर्णयाबद्दल विश्वासात घेतलं गेलं पाहिजे, अशी राज्यमंत्र्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे. युतीचं सरकार असताना सगळं दिल्लीला विचारावं लागत होतं, पण आता उद्धव ठाकरे हेच प्रमुख आहेत. त्यामुळे हा विषय लवकरच सुटेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारBacchu Kaduबच्चू कडूAbdul Sattarअब्दुल सत्तारAditi Tatkareअदिती तटकरे