शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोराडी येथे 2 बाय 660 मेगावॉट वीज निर्मिती नवीन संच उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 21:21 IST

दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला

मुंबई/नागपूर -  दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन 2 बाय 660 मेगावॉट क्षमतेच्या कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली.

वीज नियामक आयोगाकडून या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून 20 टक्के भागभांडवल मिळण्यासाठ़ी प्रस्ताव सादर करण्यासही आज मान्यता देण्यात आली. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा विजेच्या सर्वाधिक मागणी 25 हजार मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली आहे. तसेच 19 व्या ऊर्जा सर्वेक्षणानुसार अनुमानित केलेली विजेची मागणी 20363 मेगावॉट आहे. त्यापेक्षाही अधिक  मागणीची नोंद यंदा झाली आहे.

आज महाराष्ट्र विजेच्या क्षेत्रात परिपूर्ण झाला असल्यामुळेच राज्य भारनियमन मुक्त झाले आहे. आगामी काळातही महाराष्ट्रृात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये व जनतेला विजेच्या संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशानेच ऊर्जा विभागाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात  हा प्रस्ताव शासनासमोर सादर केला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.  

महावितरणच्या पुनरावलोकनानुसार सन 2023-24 मध्ये 27000 पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन 2023-24 साठ़ीचा 25 हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता 2019 मेगावॅट विजेची तूट भासू शकते.

 महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता 13602 मेगावॉट असून त्यापैकी 10170 मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी  महानिर्मितीचे 1680 मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता 2 बाय 660 मेगावॉट नवीन संचाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. सध्या संच क्रमांक 1 ते 4 बंद आहेत. या संचांच्या इमारती व संरचना हटवून ती जागा नवीन संचासाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे नवीन संचांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रस्तावित संचांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कोराडी वीज केंद्र येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्वीच यार्डमध्ये आवश्यक ते बदल करून त्याद्वारे निर्गमित होऊ शकते.या प्रकल्पात संच क्रमांक 1 काम पूर्ण होण्यासाठी 45 महिने व संच क्रमांक 2 पूर्ण होण्यासाठी 51 महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 80 टक्के रकक्म कर्ज रुपाने तर 20 टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.

संच क्रमांक 6 चे नूतनीकरण

जागतिक बँकेच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्राच्या पुनर्वसन प्रकल्पानुसार महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक 6 चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 486 कोटी व महाराष्ट्र शासनाकडून 96 कोटींच्या भागभांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास 563.12 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार