शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जागा विकत घेताय? थोडे सतर्क रहा

By मनोज मुळ्ये | Updated: March 30, 2025 10:37 IST

Konkan News: पोटापाण्यासाठी, कामधंदा मिळवण्यासाठी, कधीकाळी सोडलेल्या गावात आयुष्याची अखेरची काही वर्ष घालवण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून मुंबई, पुण्याकडील चाकरमानी मंडळी कोकणात जागा खरेदी करतात. मात्र, दुर्दैवाने अनेक प्रकरणांमध्ये त्यांची फसगत होते.

- मनोज मुळ्ये(उपमुख्य उपसंपादक, रत्नागिरी)पोटापाण्यासाठी, कामधंदा मिळवण्यासाठी, कधीकाळी सोडलेल्या गावात आयुष्याची अखेरची काही वर्ष घालवण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून मुंबई, पुण्याकडील चाकरमानी मंडळी कोकणात जागा खरेदी करतात. मात्र, दुर्दैवाने अनेक प्रकरणांमध्ये त्यांची फसगत होते. आयुष्यभराची जमापुंजी जागेत घालूनही जागेचा ताबा मिळत नाही आणि गुंतवलेले पैसेही परत मिळत नाहीत. ही फसगत टाळायची असेल तर खूप काळजीपूर्वक व्यवहार करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक व्यवहार तोंडी न ठेवता कागदावर उतरवणे महत्त्वाचे आहे.

२५ - ५० रुपयांचा एक किलो कांदा घेतानाही आपण त्यातील प्रत्येक कांदा नीट आहे की नाही, हे तपासून घेतो. पण आयुष्यभर कमावलेले कष्टाचे पैसे गुंतवताना मात्र आपण त्याच्या सर्व बाजूंचा विचार करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रलोभनांना बळी पडणं हा माणसाचा स्वभावच आहे. स्वस्तात जागा मिळते म्हणून त्यात पैसे गुंतवणारे कमी नाहीत. अर्थात प्रत्येक कागद बारकाईने तपासणाऱ्या लोकांच्या पदरीही कधी कधी फसवणूक येते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असाच एक प्रकार नुकताच घडला. जागेसाठी एकरकमी रक्कम अदा केल्यानंतर नोंदणीकृत साठेखत केले गेले. मात्र, त्यानंतर जागेचा ताबा देण्यास टंगळमंगळ करण्यात आली. त्याच ठिकाणी अन्य प्लॉटिंगमध्ये एकच प्लॉट विकण्यासंदर्भात दोन लोकांशी चर्चा झाली आणि पैसेही घेतले गेले.

असे प्रकार अलीकडे कोकणात वाढत आहेत. अर्थात यात कोकणी लोकांचा सहभाग अत्यल्प किंवा नाहीच्या बरोबरीचा आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नाही आणि असलेल्या शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. गावात शिक्षणाच्या पुरेशा सोयी नाहीत म्हणून ग्रामीण भागातील लोक शहराकडे जात आहेत. अशा लोकांकडून परप्रांतातील लोक कमी दराने जागांची खरेदी करतात. एखाद्या स्थानिक माणसाला हाताशी धरून ते अडचणीतील लोकांकडून स्वस्तात जागा पदरात पाडून घेतात. त्याचे प्लॉटिंग करतात आणि मुंबई, पुण्याकडे त्याची भली मोठी जाहिरात करतात. निसर्गरम्य गावात जागा घ्यायला कोणाला आवडणार नाही. त्यातही नोकरी, व्यवसायानिमित्त ऐन तारुण्यात गाव सोडून गेलेल्या लोकांना म्हातारपणी गावी परतावे, असे वाटते. आपल्या गावात नाही तर किमान तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोठे ना कोठे छोटीशी जागा घेऊन घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न असते. त्यामुळे कोकणातील जागांची जाहिरात मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये केली जाते आणि अशा लोकांकडून दामदुप्पट पैसे उकळले जातात. परप्रांतातून येथे येऊन असे उद्योग करणारे आता वाढू लागले आहेत.

कोकणात किंवा कोठेही जागा खरेदी करताना किंवा एखादी सदनिका खरेदी करताना खूप काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणातला निसर्ग चांगला आहे, म्हणून कोकणात नक्की या. पण फसू नका. आयुष्यभराची जमापुंजी असलेली रक्कम गुंतवल्यानंतर त्याचा परतावा म्हणून तुमच्या पदरात त्रास पडू नये, एवढीच इच्छा.

काय करायला हवे?कोठेही जागा किंवा फ्लॅट खरेदी करताना तो विकणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची माहिती गोळा करणे आवश्यक आहे.जी जागा किंवा फ्लॅट खरेदी करणार त्याची कागदपत्रे आपल्या वकिलाकडून तपासून घेणे गरजेचे आहे.जागेचा सातबारा ताब्यात घेऊन तो नेमक्या कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती सर्वात  प्रथम घेतली पाहिजे.जागांचे अनेक प्रकार आहेत. कृषक व अकृषक, खालसा, देवराई अशा वेगवेगळ्या नोंदी सातबारावर स्पष्ट असतात. त्यामुळे सातबारा तपासून जागा विकत घेण्यासाठी योग्य आहे की नाही, याची काळजी घ्यायला हवी.अर्थात सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून झाल्यानंतरही फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्लॉटिंग करणारे प्रवर्तक किंवा संस्था किंवा व्यक्ती यांच्याशी कुठलाही व्यवहार करताना तो तोंडी न करणे आणि प्रत्येक व्यवहाराची कागदावर अधिकृत नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतेही आश्वासन तोंडी न घेता ते संबंधित व्यक्तीकडून लिहून घेणे अत्यंत गरजेचे आहे. महारेरा नावाचे आयुधजमीन जागांच्या व्यवहारात लोकांची होणारी फसवणूक लक्षात घेऊन सरकारने महारेराच्या माध्यमातून खूप मोठे आयुध सर्वसामान्य खरेदीदारांना उपलब्ध करून दिले आहे. कोणत्याही प्रकल्पाची सुरुवात करताना महारेराकडे त्याची नोंदणी करावी लागते. प्रकल्प काय आहे, त्याचा खर्च किती आहे आणि तो किती काळात पूर्ण होणार आहे, याची माहिती महारेराकडे नोंदवावी लागते. महारेराच्या सर्व नियमांचे पालन संबंधित व्यक्ती, संस्था यांना करावे लागते. प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही तर महारेराच्या नियमांचे उल्लंघन केल्याची शिक्षा किंवा दंड संबंधितांना होऊ शकतो. ग्राहकाची फसवणूक, ग्राहकाला होणारा त्रास टाळण्यासाठी हे आयुध सरकारने दिले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना त्याची माहितीच नसते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण