शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

सकाळी नऊनंतरच्या शाळेला बसचालकांचाही विरोध; सरकारने सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 07:14 IST

सकाळी आठनंतर शहरांमध्ये होते प्रचंड वाहतूक कोंडी, पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. वाहनचालकांची मागणी

रेश्मा शिवडेकरमुंबई : सकाळच्या वाहतूक कोंडीत शाळांच्या बसगाड्या चालविणे अवघड असल्याचे सांगत स्कूल बस चालकांकडून पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून सक्तीचे धोरण अवलंबल्यास आंदोलनाचा इशारा बसचालक संघटनेने दिला आहे.

मुंबईत अनुदानित, खासगी शाळांमधील सुमारे ८० टक्के विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी बस किंवा व्हॅन, रिक्षांचा वापर करतात. सकाळच्या वेळेत होणाऱ्या वाहतूक कोंडीत लहान मुलांचे हाल होणार आहेत, याकडे बसचालकांनी लक्ष वेधले आहे. शाळांच्या वेळांबाबतची सक्ती केल्यास बसचालकांचा आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. सरतेशेवटी तो पालकांनाच सोसावा लागेल.  पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे (एसबीओए) अनिल गर्ग यांनी दिला.

आर्थिक भुर्दंड कसा?बसगाड्यांची संख्या वाढविली तरच बसचालकांना फेऱ्या वाढविणे शक्य होईल. बसगाड्या वाढल्या तर ती चालविण्याकरिता लागणारे मनुष्यबळ (उदा. चालक, मदतनीस, महिला सहकारी) देखील वाढवावे लागले. शिवाय इंधन खर्च वाढेल तो वेगळा. त्यामुळे फेऱ्यांची संख्या वाढविणे बसचालकांकरिता आर्थिक भुर्दंडाचे ठरणार आहे. बसचालक शेवटी हा खर्च पालकांच्या माथी मारणार. त्यामुळे वाहतूक सेवेवरील खर्चात वाढ होणार आहे.

बसचालकांचा विरोध का? मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरात कार्यालयात जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे सकाळी आठनंतर वाहतूक कोंडी प्रचंड वाढते. त्याआधीच शाळेच्या बसगाड्या पहिल्या सत्रातील मुलांना शाळेत पोहोचवितात. त्यामुळे त्यांना कोंडीचा सामना करावा लागत नाही. दुपारी बसगाड्या दुपारच्या सत्रातील मुलांना शाळेत घेऊन येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी तुलनेने कमी झालेली असते. याच गाड्यांतून पहिल्या सत्रातील मुलांना शाळेतून घरी सोडले जाते. त्यामुळे बसगाड्यांच्या खेपा वाचतात. पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडीत कमी भर पडते. मुंबईत दिसणारे हे चित्र इतर शहरांतही आहे; परंतु नऊनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरण्याची सक्ती झाल्यास ही घडी विस्कटण्याची भीती आहे.

टॅग्स :Schoolशाळा