शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सकाळी नऊनंतरच्या शाळेला बसचालकांचाही विरोध; सरकारने सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 07:14 IST

सकाळी आठनंतर शहरांमध्ये होते प्रचंड वाहतूक कोंडी, पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. वाहनचालकांची मागणी

रेश्मा शिवडेकरमुंबई : सकाळच्या वाहतूक कोंडीत शाळांच्या बसगाड्या चालविणे अवघड असल्याचे सांगत स्कूल बस चालकांकडून पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून सक्तीचे धोरण अवलंबल्यास आंदोलनाचा इशारा बसचालक संघटनेने दिला आहे.

मुंबईत अनुदानित, खासगी शाळांमधील सुमारे ८० टक्के विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी बस किंवा व्हॅन, रिक्षांचा वापर करतात. सकाळच्या वेळेत होणाऱ्या वाहतूक कोंडीत लहान मुलांचे हाल होणार आहेत, याकडे बसचालकांनी लक्ष वेधले आहे. शाळांच्या वेळांबाबतची सक्ती केल्यास बसचालकांचा आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. सरतेशेवटी तो पालकांनाच सोसावा लागेल.  पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे (एसबीओए) अनिल गर्ग यांनी दिला.

आर्थिक भुर्दंड कसा?बसगाड्यांची संख्या वाढविली तरच बसचालकांना फेऱ्या वाढविणे शक्य होईल. बसगाड्या वाढल्या तर ती चालविण्याकरिता लागणारे मनुष्यबळ (उदा. चालक, मदतनीस, महिला सहकारी) देखील वाढवावे लागले. शिवाय इंधन खर्च वाढेल तो वेगळा. त्यामुळे फेऱ्यांची संख्या वाढविणे बसचालकांकरिता आर्थिक भुर्दंडाचे ठरणार आहे. बसचालक शेवटी हा खर्च पालकांच्या माथी मारणार. त्यामुळे वाहतूक सेवेवरील खर्चात वाढ होणार आहे.

बसचालकांचा विरोध का? मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरात कार्यालयात जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे सकाळी आठनंतर वाहतूक कोंडी प्रचंड वाढते. त्याआधीच शाळेच्या बसगाड्या पहिल्या सत्रातील मुलांना शाळेत पोहोचवितात. त्यामुळे त्यांना कोंडीचा सामना करावा लागत नाही. दुपारी बसगाड्या दुपारच्या सत्रातील मुलांना शाळेत घेऊन येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी तुलनेने कमी झालेली असते. याच गाड्यांतून पहिल्या सत्रातील मुलांना शाळेतून घरी सोडले जाते. त्यामुळे बसगाड्यांच्या खेपा वाचतात. पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडीत कमी भर पडते. मुंबईत दिसणारे हे चित्र इतर शहरांतही आहे; परंतु नऊनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरण्याची सक्ती झाल्यास ही घडी विस्कटण्याची भीती आहे.

टॅग्स :Schoolशाळा