शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 02:51 IST

भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले

अलिबाग : देशातील खेड्यापाड्यात आणि दरीडोंगरात, केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर जनसामान्य ग्राहकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. असे असले तरी बीएसएनएल कर्मचारी व अधिकारी उपलब्ध साधनसामग्रीतून आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकरिता सिद्ध असल्याचे प्रतिपादन बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा सचिव पुरुषोत्तम गेडाम यांनी केले आहे.बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन रायगडच्या पाचव्या अधिवेशनाचे आयोजन शनिवारी येथील बीएसएनएल टेक्निकल बिल्डिंगमधील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात गेडाम बोलत होते. गेडाम म्हणाले की, हातपाय बांधून ठेवायचे आणि कुस्ती खेळायला सांगायचे, अशी अवस्था सरकारने बीएसएनएलची केली आहे. बीएसएनएसच्या उपलब्ध मूळ पायाभूत व्यवस्थेच्या आधाराने खासगी मोबाइल कंपन्या केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून बीएसएनएलबरोबर स्पर्धा करीत आहेत. या खासगी कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजारात उतरल्या आहेत. त्याच वेळी बीएसएनएलकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यात येत नाही, यातूनच सरकार कोणासाठी काम करते आहे हे दिसून येत आहे. बीएसएनएल मोबाइल टॉवर्स खासगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा जो प्रस्ताव आहे त्यास आमचा सक्त विरोध राहाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव म्हणाले की, रायगड जिल्ह्यात होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या विशेषत: महामार्गांच्या कामांमुळे बीएसएनएलची ओएफसी केबल तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यातील समस्यांचे स्वरूप राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे असल्याने, येथील समस्या दूरकरण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. परंतु ग्राहकांना उत्तम विनाखंड सेवा देण्याकरिता अखेर आपल्यालाच काम करावे लागणार आहे. अशाही परिस्थितीत बीएसएनएल जिल्ह्यातील बँका, ग्रामीण क्षेत्र, रुग्णालये, ग्रामपंचायती यांना चांगली सेवा देण्यात यशस्वी होत असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले. बीएसएनएल कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले.यावेळी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल जोग, बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव, बीएसएनएल कामगार संघटनेचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र माने, दीपक जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.