शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 02:51 IST

भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले

अलिबाग : देशातील खेड्यापाड्यात आणि दरीडोंगरात, केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर जनसामान्य ग्राहकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. असे असले तरी बीएसएनएल कर्मचारी व अधिकारी उपलब्ध साधनसामग्रीतून आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकरिता सिद्ध असल्याचे प्रतिपादन बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा सचिव पुरुषोत्तम गेडाम यांनी केले आहे.बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन रायगडच्या पाचव्या अधिवेशनाचे आयोजन शनिवारी येथील बीएसएनएल टेक्निकल बिल्डिंगमधील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात गेडाम बोलत होते. गेडाम म्हणाले की, हातपाय बांधून ठेवायचे आणि कुस्ती खेळायला सांगायचे, अशी अवस्था सरकारने बीएसएनएलची केली आहे. बीएसएनएसच्या उपलब्ध मूळ पायाभूत व्यवस्थेच्या आधाराने खासगी मोबाइल कंपन्या केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून बीएसएनएलबरोबर स्पर्धा करीत आहेत. या खासगी कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजारात उतरल्या आहेत. त्याच वेळी बीएसएनएलकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यात येत नाही, यातूनच सरकार कोणासाठी काम करते आहे हे दिसून येत आहे. बीएसएनएल मोबाइल टॉवर्स खासगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा जो प्रस्ताव आहे त्यास आमचा सक्त विरोध राहाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव म्हणाले की, रायगड जिल्ह्यात होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या विशेषत: महामार्गांच्या कामांमुळे बीएसएनएलची ओएफसी केबल तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यातील समस्यांचे स्वरूप राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे असल्याने, येथील समस्या दूरकरण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. परंतु ग्राहकांना उत्तम विनाखंड सेवा देण्याकरिता अखेर आपल्यालाच काम करावे लागणार आहे. अशाही परिस्थितीत बीएसएनएल जिल्ह्यातील बँका, ग्रामीण क्षेत्र, रुग्णालये, ग्रामपंचायती यांना चांगली सेवा देण्यात यशस्वी होत असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले. बीएसएनएल कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले.यावेळी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल जोग, बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव, बीएसएनएल कामगार संघटनेचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र माने, दीपक जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.