शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 02:51 IST

भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले

अलिबाग : देशातील खेड्यापाड्यात आणि दरीडोंगरात, केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर जनसामान्य ग्राहकांना दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)या सरकारच्या कंपनीला निधी उपलब्ध करून देण्याऐवजी, खासगी दूरध्वनी व मोबाइल कंपन्यांना सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. असे असले तरी बीएसएनएल कर्मचारी व अधिकारी उपलब्ध साधनसामग्रीतून आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकरिता सिद्ध असल्याचे प्रतिपादन बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा सचिव पुरुषोत्तम गेडाम यांनी केले आहे.बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन रायगडच्या पाचव्या अधिवेशनाचे आयोजन शनिवारी येथील बीएसएनएल टेक्निकल बिल्डिंगमधील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ‘ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात गेडाम बोलत होते. गेडाम म्हणाले की, हातपाय बांधून ठेवायचे आणि कुस्ती खेळायला सांगायचे, अशी अवस्था सरकारने बीएसएनएलची केली आहे. बीएसएनएसच्या उपलब्ध मूळ पायाभूत व्यवस्थेच्या आधाराने खासगी मोबाइल कंपन्या केवळ नफा डोळ्यासमोर ठेवून बीएसएनएलबरोबर स्पर्धा करीत आहेत. या खासगी कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजारात उतरल्या आहेत. त्याच वेळी बीएसएनएलकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यात येत नाही, यातूनच सरकार कोणासाठी काम करते आहे हे दिसून येत आहे. बीएसएनएल मोबाइल टॉवर्स खासगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा जो प्रस्ताव आहे त्यास आमचा सक्त विरोध राहाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव म्हणाले की, रायगड जिल्ह्यात होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या विशेषत: महामार्गांच्या कामांमुळे बीएसएनएलची ओएफसी केबल तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यातील समस्यांचे स्वरूप राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे असल्याने, येथील समस्या दूरकरण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. परंतु ग्राहकांना उत्तम विनाखंड सेवा देण्याकरिता अखेर आपल्यालाच काम करावे लागणार आहे. अशाही परिस्थितीत बीएसएनएल जिल्ह्यातील बँका, ग्रामीण क्षेत्र, रुग्णालये, ग्रामपंचायती यांना चांगली सेवा देण्यात यशस्वी होत असल्याचे त्यांनी अखेरीस नमूद केले. बीएसएनएल कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले.यावेळी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल जोग, बीएसएनएल टेलिकॉम डिस्ट्रीक्ट मॅनेजर सी.व्ही.राव, बीएसएनएल कामगार संघटनेचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र माने, दीपक जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.