शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

Lendi River Bridge: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीला बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:31 IST

Lendi River Bridge News: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल कमकुवत झाला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

जव्हार-सारसून रस्त्यावरील लेंडी नदीवरील ९.५० मीटरचा व ५ गाळ्यांच्या पुलाचे बांधकाम १९९२ साली झाले होते. दोन वर्षापूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती, मात्र जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून पाणी जाऊन पूल पूर्णपणे बुडाला होता.

या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हे २९ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आले होते, त्यात हा पूल कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. यावर्षी या पुलाची दुरुस्ती तथा नवीन बांधकाम न झाल्याने पुलावरून अवजड वाहतूक १८ जूनपासून ते १७जुलैपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार बाजूकडून पुढे जाण्याकरिता चालतवग्रमार्गे सायवन-ओझर या मार्गाने व जव्हार बाजूकडे येताना वावर वांगणी माळधर-खंडीपाडा या मार्गाने प्रवास करता येणार आहे.

भातसा नदीवरील पूल डळमळीतशहापूर-किन्हवली-मुरबाड रस्त्यावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत आहे. वारंवार डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून या पुलाचा खालचा भाग कोसळला असून, काही भाग खचला आहे. या पुलावरून कर्जत, मुरबाड, अहमदनगर, जेएनपीए येथून येणान्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नवीन पूल बांधण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून नागरिक करीत आहेत. निविदा प्रक्रिया झाली आहे; परंतु काम रखडले आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा हा पूल पाण्याखाली जातो. नवीन पूल मंजूर आहे; पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासन पूल कोसळण्याची वाट बघत आहे का, असा सवाल माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती वंदना भांडे यांनी केला.

नांदगाव पूल कमकुवतसार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केलेले हे पूल वास्तविक पाहता तोडणे गरजेचे असताना नऊ वर्षे है पूल सुरूच आहेत. पनवेल तालुक्यात नावडे, नांदगाव हे पूलदेखील थोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहू लागताच या पुलापर्यंत पाणी येते. काही वेळेला अतिवृष्टीत नांदगाव पूल पाण्याखाली जातो. अशावेळेला या पुलावरून वाहतूक करणारी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. कोकणाचा भाग असल्याने पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. अशावेळी अपघाताची भीती अधिक असल्याने प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर सतर्कता बाळगावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडी