शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Lendi River Bridge: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीला बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:31 IST

Lendi River Bridge News: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल कमकुवत झाला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

जव्हार-सारसून रस्त्यावरील लेंडी नदीवरील ९.५० मीटरचा व ५ गाळ्यांच्या पुलाचे बांधकाम १९९२ साली झाले होते. दोन वर्षापूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती, मात्र जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून पाणी जाऊन पूल पूर्णपणे बुडाला होता.

या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हे २९ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आले होते, त्यात हा पूल कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. यावर्षी या पुलाची दुरुस्ती तथा नवीन बांधकाम न झाल्याने पुलावरून अवजड वाहतूक १८ जूनपासून ते १७जुलैपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार बाजूकडून पुढे जाण्याकरिता चालतवग्रमार्गे सायवन-ओझर या मार्गाने व जव्हार बाजूकडे येताना वावर वांगणी माळधर-खंडीपाडा या मार्गाने प्रवास करता येणार आहे.

भातसा नदीवरील पूल डळमळीतशहापूर-किन्हवली-मुरबाड रस्त्यावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत आहे. वारंवार डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून या पुलाचा खालचा भाग कोसळला असून, काही भाग खचला आहे. या पुलावरून कर्जत, मुरबाड, अहमदनगर, जेएनपीए येथून येणान्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नवीन पूल बांधण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून नागरिक करीत आहेत. निविदा प्रक्रिया झाली आहे; परंतु काम रखडले आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा हा पूल पाण्याखाली जातो. नवीन पूल मंजूर आहे; पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासन पूल कोसळण्याची वाट बघत आहे का, असा सवाल माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती वंदना भांडे यांनी केला.

नांदगाव पूल कमकुवतसार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केलेले हे पूल वास्तविक पाहता तोडणे गरजेचे असताना नऊ वर्षे है पूल सुरूच आहेत. पनवेल तालुक्यात नावडे, नांदगाव हे पूलदेखील थोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहू लागताच या पुलापर्यंत पाणी येते. काही वेळेला अतिवृष्टीत नांदगाव पूल पाण्याखाली जातो. अशावेळेला या पुलावरून वाहतूक करणारी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. कोकणाचा भाग असल्याने पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. अशावेळी अपघाताची भीती अधिक असल्याने प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर सतर्कता बाळगावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडी