शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

Lendi River Bridge: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीला बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:31 IST

Lendi River Bridge News: पालघर जिल्ह्यातील लेंडी नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल कमकुवत झाला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

जव्हार-सारसून रस्त्यावरील लेंडी नदीवरील ९.५० मीटरचा व ५ गाळ्यांच्या पुलाचे बांधकाम १९९२ साली झाले होते. दोन वर्षापूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती, मात्र जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून पाणी जाऊन पूल पूर्णपणे बुडाला होता.

या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हे २९ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आले होते, त्यात हा पूल कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. यावर्षी या पुलाची दुरुस्ती तथा नवीन बांधकाम न झाल्याने पुलावरून अवजड वाहतूक १८ जूनपासून ते १७जुलैपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार बाजूकडून पुढे जाण्याकरिता चालतवग्रमार्गे सायवन-ओझर या मार्गाने व जव्हार बाजूकडे येताना वावर वांगणी माळधर-खंडीपाडा या मार्गाने प्रवास करता येणार आहे.

भातसा नदीवरील पूल डळमळीतशहापूर-किन्हवली-मुरबाड रस्त्यावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत आहे. वारंवार डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून या पुलाचा खालचा भाग कोसळला असून, काही भाग खचला आहे. या पुलावरून कर्जत, मुरबाड, अहमदनगर, जेएनपीए येथून येणान्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नवीन पूल बांधण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून नागरिक करीत आहेत. निविदा प्रक्रिया झाली आहे; परंतु काम रखडले आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा हा पूल पाण्याखाली जातो. नवीन पूल मंजूर आहे; पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासन पूल कोसळण्याची वाट बघत आहे का, असा सवाल माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती वंदना भांडे यांनी केला.

नांदगाव पूल कमकुवतसार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केलेले हे पूल वास्तविक पाहता तोडणे गरजेचे असताना नऊ वर्षे है पूल सुरूच आहेत. पनवेल तालुक्यात नावडे, नांदगाव हे पूलदेखील थोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहू लागताच या पुलापर्यंत पाणी येते. काही वेळेला अतिवृष्टीत नांदगाव पूल पाण्याखाली जातो. अशावेळेला या पुलावरून वाहतूक करणारी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. कोकणाचा भाग असल्याने पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. अशावेळी अपघाताची भीती अधिक असल्याने प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर सतर्कता बाळगावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :palgharपालघरMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडी