शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मांडवातून नववधू पैसे घेऊन पसार; अकोल्यातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:18 IST

राजस्थानच्या युवकासोबत सात फेरे घेतल्यानंतर भर लग्नसोहळ्यातून नवरी व तिचे नातेवाईक ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार येथील रिधोरा गावाजवळ सोमवारी दुपारी घडला.

अकोला : राजस्थानच्या युवकासोबत सात फेरे घेतल्यानंतर भर लग्नसोहळ्यातून नवरी व तिचे नातेवाईक ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार येथील रिधोरा गावाजवळ सोमवारी दुपारी घडला. फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीची बाळापूर पोलिसांनी नोंद केली आहे.राजस्थानमधील एका ३० वर्षीय युवकाला अकोल्यातील एका मध्यस्थामार्फत स्थळ चालून आले. लग्नासाठी मुलीकडच्या लोकांना खर्चासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे या युवकाला सांगण्यात आले होते. सोमवारी संबंधित युवक अकोल्यात आल्यावर त्याला खदान परिसरातील एक युवती मध्यस्थाने दाखविली. मुलगी पसंत आल्यावर मध्यस्थाने लग्न उरकून घेण्याची घाई केली. युवकही बोहल्यावर चढण्यास चटकन तयार झाला.मध्यस्थ, युवती आणि तिच्या काही नातेवाईकांनी रिधोरा येथील एका मंदिरामध्ये सोमवारीच लग्न लावण्याची तयारी दर्शविल्यानंतर सर्व जण मंदिरात आले.फसवणूक करणारी टोळी सक्रियलग्नासाठी इच्छुक परप्रांतीय युवकांना हेरून त्यांना मुली दाखविण्यात येतात आणि बनावट लग्न लावून युवकांकडून लाखो रुपये उकळले जातात. नंतर काहीतरी कारण सांगून मुलीसह तिचे सहकारीसुद्धा पैसे घेऊन गायब होतात. यापूर्वी अकोल्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांवरून अकोल्यात बनावट लग्न लावून फसवणूक करणारी एक टोळीच सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.- ‘नवरी सासरी रवाना होण्यापूर्वी आम्ही तिची नातेवाईकांशी भेट घडवून आणतो,’ असे नातेवाईकांनी नवरदेवाला सांगितले. त्यानंतर नवरीसह तिचे नातेवाईक निघून गेले. काही वेळातच मध्यस्थही पसार झाला.

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्न