शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

व्यवसाय करण्याच्या हक्कावर मद्यविक्रेते दावा करू शकत नाहीत

By admin | Published: March 21, 2017 3:47 AM

राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत आपल्याला व्यवसाय करण्याचा हक्क आहे, असा दावा मद्यविक्रेते करू शकत नाहीत, असा निर्वाळा

मुंबई : राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत आपल्याला व्यवसाय करण्याचा हक्क आहे, असा दावा मद्यविक्रेते करू शकत नाहीत, असा निर्वाळा सोमवारी उच्च न्यायालयाने दिला. राज्य सरकारला या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.ताडी-माडी विक्री केंद्र चालवण्यासंदर्भात राज्य सरकारने २०१६मध्ये काढलेल्या अधिसूचनेला काही ताडी-माडी विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. २०१६च्या राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, ताडी-माडी विक्री केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीची ताडीची १ हजार झाडे असणे बंधनकारक आहे. तसेच तो ज्या भागाचा रहिवासी आहे, त्याच भागातील ताडी-माडी विक्री केंद्र चालवण्याचा परवाना देण्यात येईल. या अधिसूचनेमुळे परवानाधारकांना तालुक्याबाहेर ताडी-माडी विकण्यावर निर्बंध आला. ज्यांच्याकडे आधीपासूनच परवाना आहे, त्यांचे म्हणणे लक्षात न घेताच राज्य सरकारने ताडी-माडी विक्री केंद्रांचा लिलाव केला. राज्य सरकारची ही अधिसूचना बेकायदा व मनमानी आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी ताडी-माडी विक्रेत्यांनी याचिकांद्वारे केली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारचा हा मनमानी कारभार असून, ताडी-माडी विक्रेत्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत नागरिकांना त्यांना हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे. मात्र राज्य सरकार या हक्कावरच गदा आणत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. तर ही अधिसूचना जनहितार्थ काढल्याचे राज्य सरकारने खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)