शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बहिष्कार, गावबंदी अन् उपोषण; आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक जिल्ह्यांत मराठा समाज पुन्हा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 05:54 IST

मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा समाजबांधवांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शासनाला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत मराठा आरक्षण जाहीर झालेले नसल्याने आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा समाजबांधवांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

उड्डाणपुलाखाली साखळी उपोषण

हिंगोली/अहमदनगर : राज्य सरकारने आश्वासन देऊन एक महिना उलटून गेला तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथील उड्डाणपुलाखाली मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, जामखेड, अहमदनगर, श्रीरामपूर येथेही बुधवारपासून साखळी उपोषण सुरू झाले.

पंढरपूर : २५ गावांत नेत्यांना बंदी

पंढरपूर : तालुक्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने जोर धरलेला असून, मागील चार दिवसांत २५ गावांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी जाहीर केलेली आहे. वाखरी येथे गुरुवारपासून साखळी उपोषण केले जाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.  

आरक्षण नाही तर निवडणूक नाही; ३४ उमेदवारी अर्ज मागे 

वझूर, ताडकळस (जि. परभणी) : मराठा आरक्षणासाठी पूर्णा तालुक्यातील वझूरच्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व ३४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. मराठा समाजाला आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाही, असा निर्धार केला.

युवक चढला टॉवरवर

खर्डा (जि. अहमदनगर) : आरक्षण मागणीसाठी खर्डा (ता. जामखेड) येथील संतोष साबळे या युवकाने मोबाइल कंपनीच्या टॉवरवर चढून बुधवारी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

३०० फूट उंच टॉवरवर उपोषण

करमाड (छत्रपती संभाजीनगर): शेकटा येथील ३०० फूट उंच मोबाइल टॉवरवर चढून बुधवारपासून प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यातही याच टॉवरवर त्यांनी ३० तासांचे उपोषण केले होते.

तीन मुलांच्या पित्याने मृत्यूला कवटाळले 

ईट (जि. धाराशिव) : ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी खिशात ठेवून बुधवारी दुपारी भूम (ता. निपाणी) येथे तीन मुलांच्या पित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण काकासाहेब घाेडके (३६) असे त्यांचे नाव आहे. गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथे मंगळवारी रात्री जयराम कान्हेरे (३२) याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आकाश वैजनाथराव शिंदे (३०) याने हाताची नस कापून घेत बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.

...ते काय आरक्षण देणार?

मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही. त्यामुळे ते काय आरक्षण देणार?, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही हे पुन्हा एकदा दिसून आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, यात जे काही न्यायिक आणि तांत्रिक अडचण आहे, ती दूर कशी करायची, यासाठी सरकारमधील तिन्ही पक्षांचे चिंतन मंथन सुरू आहे.  - प्रफुल पटेल, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण