शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

बाटलीबंद पाणी 'मिनरल वॉटर' नसते, जाणून घ्या सरकारी सत्यवचन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 11:52 IST

पुण्यातील येवले चहाने वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्यात आमच्याकडे चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते,

बाटलीबंद पाणी किंवा जारमधील पिण्याचे पाणी आपण मिनरल वॉटर म्हणून विकत घेतो आणि पीत असतो. मात्र, प्रत्येक बाटलीबंद पाणी हे मिनरल वॉटर नाही. कायद्याच्या चौकटीत मिनरल वॉटरची व्याख्या वेगळीच आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, दुकानात किंवा इतरत्र मिळणारे बाटलीबंद पाणी हे मिनरल वॉटर नाही, हेच सत्य आहे. कायद्यानुसार किंवा सरकारी दफ्तरातील मिनरल वॉटरच्या वाख्येनुसार ज्या पाण्यावर कुठलिही प्रकिया केली जात नाही, तेच मिनरल वॉटर असते. 

पुण्यातील येवले चहाने वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्यात आमच्याकडे चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते, असे म्हटले होते. मात्र, एफडीआयमधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या चहा स्टॉलवर धाड मारल्यानंतर ही जाहीरात दिशाभूल करणारी असल्याचे एफडीएने म्हटले आहे. या प्रकरणी एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी येवले चहाला नोटीसही बजावली आहे. तसेच, अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौंसिल ऑफ इंडियाकडे देखील तक्रार नोंदविल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार व रमाकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

बाजारात मिळणारे विविध कंपन्यांच्या पाण्याला मिनरल वॉटर म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे. मात्र, कायद्यात मिनरल वॉटर आणि बाटलीबंद पाणी यांची व्याख्या वेगळी आहे. गंगोत्रीच्या खोऱ्यामधील नैसर्गिक पाण्याला मिनरल वॉटर म्हटले जाते. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. निसर्गत:च ते पाणी शुद्ध असते. इतर, ठिकाणचे बाटलीबंद पाणी हे प्रक्रियायुक्त असते, असे यावेळी सह आयुक्त संजय नारागुडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे, मिनरल वॉटरसंदर्भातील आपलाही समज चुकीचा ठरला असून जे गंगोत्री येथून मिळते, तेच फक्त मिनरल वॉटर आहे. तर, आपण विकत घेतो ते बाटलीबंद पाणी आहे.  

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेWaterपाणी