शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे 'गोड' भेट देणार; समुद्राचं पाणीही पिता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 10:05 IST

मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देमुंबईकरांना आता गोड पाण्याचा पुरवठा होणारसमुद्राचे पाणीही पिता येण्यासाठी प्रकल्पाला मंजुरीमहापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी

मुंबई :मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. (bmc approved plan to set up desalination plant to purify seawater)

मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा नियमितपणे व्हावा, यासाठी गेले काही वर्ष नव्या स्रोताबाबत विचार केला जात होता. काही वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते गोड पाणी मुंबईकरांना पुरवण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर आला होता. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगून तो स्वीकारला नाही. यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समुद्राचे पाणी गोड करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले होते. 

इंधन दरात पुन्हा वाढ; मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर जाणून घ्या

प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, महापालिका यासाठी ५.५० कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजी या कंपनीची निवड करण्यात आली असून, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल या कंपनीकडून देण्यात येणार आहे. 

तीस महिन्यांत प्रकल्पाचे बांधकाम

समुद्राचे सुमारे २०० दशलक्ष लीटर पाण्याचे शुद्ध केले जाणार असून, ते गोड पाणी मुंबईकरांना पुरवण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा मसुदा आणि निविदा यांसाठी महापालिकेकडून ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे बांधकाम आणि देखरेख करणाऱ्या कंपनीला २० वर्षांसाठी काम दिले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च १९२० हजार कोटी रुपयांवर जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. सल्लागार कंपनीने ८ महिन्यात या प्रकल्पाचा अहवाल तयार करून द्यायचा असून ३० महिन्यात प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

नैसर्गिक स्रोतांवर भर द्यावा

समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या या प्रकल्पात एक लीटर पाण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार आहे. विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असून, नैसर्गिक स्त्रोत शोधण्यावर आणि त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्यावर भर द्यायला हवा होता, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी पर्यटन विभागाची मनोर येथील १२ हेक्‍टर जागा निवडण्यात आलेली असून, ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई