शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

रक्तदानाला किंमतच उरली नाही!, १ हजार ९२ युनिट्स रक्त वाया, मुंबईतील रक्तपेढ्यांमधील धक्कादायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:18 AM

शहर-उपनगरातील ३४ शासकीय आणि पालिकेच्या रक्तपेढ्यांमधील तब्बल १ हजार ९२ युनिट्स रक्त, जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत वाया गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मुंबई : शहर-उपनगरातील ३४ शासकीय आणि पालिकेच्या रक्तपेढ्यांमधील तब्बल १ हजार ९२ युनिट्स रक्त, जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत वाया गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या काळात १ हजार ९२ युनिट्स म्हणजेच, जवळपास ३८२ लीटर रक्त वाया गेले आहे. रक्तपेढ्यांमधील अपुºया व्यवस्थापनामुळे हे रक्त वाया गेल्याचे, माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे दात्यांच्या रक्तदानाला किंमतच उरली नसल्याचे चित्र आहे.बºयाचदा रक्तपेढ्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रक्ताची साठवणूक झालेली असते. अशा परिस्थितीत रक्तपेढ्यांनी अन्य पेढ्यांशी संवाद साधून हे रक्त वापरले पाहिजे, परंतु रक्तपेढ्यांमध्ये संभाषणाचा अभाव दिसून आल्याने, या पेढ्यांमधील रक्ताची देवाणघेवाण होताना दिसत नाही, तसेच शहर-उपनगरात केवळ ‘रेकॉर्ड्स’च्या नावाखाली रक्तदान शिबिरे राबविली जातात. या शिबिरांमधील दान केलेल्या रक्ताची वैधता एकाच वेळी संपते. त्यामुळे बºयाचदा रक्त वाया जाते. त्याचप्रमाणे, राजकीय नेते आणि संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रक्तदान आयोजित केले जाते, परंतु त्याचा वापर मात्र तितका होत नाही. त्यामुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण वाढताना दिसते.विविध सामाजिक संस्था, तसेच राजकीय पक्षांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या वेळी गोळा करण्यात आलेल्या रक्ताचा वापर सुयोग्य पद्धतीने, तसेच क्रमवारीने करावा लागतो. रक्तसंकलन झाल्यावर त्यात एचआयव्ही, मलेरिया, कावीळ, तसेच संसर्गविरहित रक्ताची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यानंतर, रक्तातील घटकांचे विघटन करून, त्यांची साठवणूक करण्यात येते. क्रमवारीमध्ये जे रक्त प्रथम रक्तपेढीमध्ये येते, त्यांचे वितरण आधी करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात ही क्रमवारी पाळली जात नाही. त्यामुळे रक्तसंचय झाला, तरी ठरावीक मुदतीमध्ये रक्त वितरित केले जात नाही, या पिशव्या फेकून द्याव्या लागतात. याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.>या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द होणारमुंबईतील सेंट जॉर्ज, नायर, कामा आणि व्ही. एन. देसाई या रक्तपेढ्यांच्या परवान्यांची वैधता डिसेंबर महिन्यांत संपणार आहे, तर सर जे. जे. रुग्णालय, वांद्रे भाभा आणि टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांचे परवाने नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहेत.>‘रक्त संक्रमण अधिकाºयांची’ही वानवानियमानुसार रक्तपेढ्यांमध्ये किमान चार रक्त संक्रमण अधिकारी हवेत. मात्र, शहर-उपनगरातील ९रक्तपेढ्यांमध्ये चारपेक्षा कमी रक्त संक्रमण अधिकारी असल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यात आयएनएचएस अश्विनी, वांद्रे भाभा, नायर, सायन, राजावाडी, कामा, व्ही. एन. देसाई, भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर आणि टाटा मेमोरिअलच्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे.>खासगी रक्तपेढ्यांवर कोणाचे नियंत्रण?खासगी रक्तपेढ्यांवर कोणाचे नियंत्रण आहे, त्यांच्याबाबतचे नेमके निकष कोणते, अशी विचारणा परिषदेने माहिती आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समजते.>गेल्या वर्षी रक्तसंकलनात मुंबई आघाडीवरगेल्या वर्षभरात झालेल्या रक्तसंकलनात मुंबईने सर्वाधिक (३ लाख ४० हजार युनिट) रक्तसंकलन केले. त्या पाठोपाठ पुणे (२ लाख ५० हजार), नागपूर (१ लाख २८ हजार), ठाणे (१ लाख २५ हजार) आणि सोलापूर (१ लाख ०२ हजार) या जिल्ह्यांचा क्रमांक आहे.