शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

'Blackout' crisis in Maharashtra: महाराष्ट्रावर वीजसंकट! कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; सणासुदीच्या काळात Load sheddingचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:43 IST

'Blackout' crisis in India, 'Blackout' crisis in Maharashtra: एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडल्याने तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे. संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले असून खुल्या बाजारातून महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे.वीज खरेदीचे दर महागदेशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहेत. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर रविवारी सकाळी रियल टाइम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्रे आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे. ...तर भारनियमन अटळअतिवृष्टी झाल्याने कोळशांच्या खाणींमधून कोळसा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यावरही तोडगा काढला जाईल, असे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे. मात्र येत्या चार ते पाच दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मात्र राज्यभरात भारनियमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे  यांनी दिली.

महावितरणची उपाययोजनासकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन ग्राहकांना केले आहे.विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू आहे.भारनियमन टाळण्यासाठी कृषी वाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

‘ऑक्टोबर हीट’मुळे मागणी वाढलीऑक्टोबर महिन्यात उष्मा वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. मुंबई वगळून राज्यात शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेच्या मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. -रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर  महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५,८०० मेगावॅट विजेची मागणी होती. 

वीजसंकटाची भीती निराधार : केंद्रीय ऊर्जामंत्रीघटत चाललेल्या कोळशाच्या साठ्यामुळे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली. परंतु यामुळे वीजसंकट निर्माण होण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले की, ही शक्यता निराधार आहे, वीजसंकट कधीही नव्हते आणि कधीही येणारही नाही.    

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र