शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

'Blackout' crisis in Maharashtra: महाराष्ट्रावर वीजसंकट! कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; सणासुदीच्या काळात Load sheddingचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:43 IST

'Blackout' crisis in India, 'Blackout' crisis in Maharashtra: एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडल्याने तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे. संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले असून खुल्या बाजारातून महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे.वीज खरेदीचे दर महागदेशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहेत. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर रविवारी सकाळी रियल टाइम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्रे आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे. ...तर भारनियमन अटळअतिवृष्टी झाल्याने कोळशांच्या खाणींमधून कोळसा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यावरही तोडगा काढला जाईल, असे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे. मात्र येत्या चार ते पाच दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मात्र राज्यभरात भारनियमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे  यांनी दिली.

महावितरणची उपाययोजनासकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन ग्राहकांना केले आहे.विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू आहे.भारनियमन टाळण्यासाठी कृषी वाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

‘ऑक्टोबर हीट’मुळे मागणी वाढलीऑक्टोबर महिन्यात उष्मा वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. मुंबई वगळून राज्यात शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेच्या मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. -रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर  महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५,८०० मेगावॅट विजेची मागणी होती. 

वीजसंकटाची भीती निराधार : केंद्रीय ऊर्जामंत्रीघटत चाललेल्या कोळशाच्या साठ्यामुळे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली. परंतु यामुळे वीजसंकट निर्माण होण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले की, ही शक्यता निराधार आहे, वीजसंकट कधीही नव्हते आणि कधीही येणारही नाही.    

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र