शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भाजपाकडून सुडाचे राजकारण : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:14 IST

विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे़ त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली

नांदेड : विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली, परंतु भाजपाच्या अशा दबावतंत्रापुढे काँग्रेसचे नेते कधीही खचणार नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर सातत्याने कठोर शब्दात टीका केली आहे़ याबाबत त्यांनी लेखणीद्वारेही सरकारच्या धोरणावर निर्भीडपणे मत मांडले आहे़ त्याचा भाजपाच्या नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून राग होता़ दुसरीकडे देशवासीयांचे हजारो कोटी रुपये घेऊन पळालेल्या नीरव मोदी याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष वळण्यासाठी कार्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली़ काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या नातेवाइकांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतवून त्यांच्यावर कारवाई ही सूडबुद्धीने करण्याचा भाजपाचा उद्योग सुरू आहे़ चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई वरवर वाटत असली, तरी त्यामागे फार मोठे षड्यंत्र आहे, असेही ते म्हणाले़दबावाला बळी पडणार नाही-चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई वरवर वाटत असली, तरी त्यामागे फार मोठे षड्यंत्र आहे़, परंतु अशा कुठल्याही दबावाला काँग्रेसचे नेते बळी पडणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणKarti Chidambaramकार्ती चिदंबरमBJPभाजपा