शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

भाजपाकडून सुडाचे राजकारण : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:14 IST

विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे़ त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली

नांदेड : विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली, परंतु भाजपाच्या अशा दबावतंत्रापुढे काँग्रेसचे नेते कधीही खचणार नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर सातत्याने कठोर शब्दात टीका केली आहे़ याबाबत त्यांनी लेखणीद्वारेही सरकारच्या धोरणावर निर्भीडपणे मत मांडले आहे़ त्याचा भाजपाच्या नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून राग होता़ दुसरीकडे देशवासीयांचे हजारो कोटी रुपये घेऊन पळालेल्या नीरव मोदी याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष वळण्यासाठी कार्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली़ काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या नातेवाइकांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतवून त्यांच्यावर कारवाई ही सूडबुद्धीने करण्याचा भाजपाचा उद्योग सुरू आहे़ चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई वरवर वाटत असली, तरी त्यामागे फार मोठे षड्यंत्र आहे, असेही ते म्हणाले़दबावाला बळी पडणार नाही-चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई वरवर वाटत असली, तरी त्यामागे फार मोठे षड्यंत्र आहे़, परंतु अशा कुठल्याही दबावाला काँग्रेसचे नेते बळी पडणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणKarti Chidambaramकार्ती चिदंबरमBJPभाजपा