शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

विधान सभेला अजित पवारांना लक्ष्य करण्याची भाजपची 'रणनिती' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 11:20 IST

अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशभरात शानदार विजय मिळवला. त्यासाठी खास रणनिती भाजपकडून करण्यात आली होती. प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक विभागात भाजपकडून विशिष्ट व्यक्तींवर हल्लाबोल करण्यात आला होता. महाराष्ट्रात काँग्रेसला वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रडारवर शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय होते. भाजपला ही रणनिती फायदेशीरच ठरली. आता भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन रणनिती आखल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपुरात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधानांनी पवार कुटुंबियांवर हल्लाबोल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. परंतु, ही भाजपची निवडणुकीची रणनिती होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. त्याच पद्धतीची रणनिती आता पुन्हा आखण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, यावेळी शरद पवार नव्हे तर अजित पवार भाजपच्या रणनितीच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा आणि अजित पवार यांनी धरणातील पाण्यावर केलेले वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. आता तेच शस्त्र पुन्हा सत्ताधारी भाजपकडून काढण्यात आल्याचे दिसून येते. त्याला शिवसेनेची देखील साथ मिळताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर टीका करताना पार्थ पवार केंद्रस्थानी होते. पार्थला उमेदवारी दिली नसती तर, अजित पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केले असते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

एकंदरीत अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे.