शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

विधान सभेला अजित पवारांना लक्ष्य करण्याची भाजपची 'रणनिती' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 11:20 IST

अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशभरात शानदार विजय मिळवला. त्यासाठी खास रणनिती भाजपकडून करण्यात आली होती. प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक विभागात भाजपकडून विशिष्ट व्यक्तींवर हल्लाबोल करण्यात आला होता. महाराष्ट्रात काँग्रेसला वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रडारवर शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय होते. भाजपला ही रणनिती फायदेशीरच ठरली. आता भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन रणनिती आखल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपुरात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधानांनी पवार कुटुंबियांवर हल्लाबोल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. परंतु, ही भाजपची निवडणुकीची रणनिती होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. त्याच पद्धतीची रणनिती आता पुन्हा आखण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, यावेळी शरद पवार नव्हे तर अजित पवार भाजपच्या रणनितीच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा आणि अजित पवार यांनी धरणातील पाण्यावर केलेले वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. आता तेच शस्त्र पुन्हा सत्ताधारी भाजपकडून काढण्यात आल्याचे दिसून येते. त्याला शिवसेनेची देखील साथ मिळताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर टीका करताना पार्थ पवार केंद्रस्थानी होते. पार्थला उमेदवारी दिली नसती तर, अजित पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केले असते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

एकंदरीत अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे.