शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं, पण...; शिवसेनेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 09:35 IST

ही भाजपाची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करून शिवसेना संपवण्याचा डाव आहे असं शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान म्हणाले.

मुंबई - वर्षावर एकनाथ शिंदे यांना बोलावलं, मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं असेल तर मी पायउतार होतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. या घटनेला आदित्य ठाकरे साक्षीदार होते. शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती. आमदारांना माझ्यासमोर आणा, आपण चर्चेतून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना कळवलं परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदारांनी सूरत, गुवाहाटी गोवा प्रवास सुरू केला असा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केला आहे. 

हर्षल प्रधान म्हणाले की, मुख्यमंत्रिपदावर असलेल्या माणसाला प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या हालचालीची माहिती असते. अख्खं पोलीस विभाग ही माहिती पुरवत असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना काय प्रॉब्लेम आहे? असं विचारलं. तर आमदारांना भाजपासोबत जायचं आहे असं ते म्हणाले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी ज्यांना भाजपासोबत जायचं आहे त्यांना माझ्यासमोर आणा, मी सगळ्यांशी बोलतो. त्यावर चर्चा करून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं. तेव्हा ठीक आहे मी घेऊन येतो असं शिंदेंनी म्हटलं परंतु त्यानंतर त्यांनी आमदारांना घेऊन सूरत, गुवाहाटी गाठलं असं त्यांनी सांगितले. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच भाजपाला शिवसेना संपवायची आहे. ही भाजपाची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करून शिवसेना संपवण्याचा डाव आहे. यामुळे शिवसेना कमकुवत झाली नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद कमकुवत झाली. शिवसेनेचं नुकसान काय झालं? ज्या माणसाला सामान्य माणूस ते आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं हे कुणामुळे झालं? शिवसैनिक असल्यामुळेच त्यांना हे मिळालं. स्वत:च्या आजारपणाकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले नाही. शिवसेना हेच माझं कुटुंब आहे याचदृष्टीने काम करतात. शिवसैनिक आजही काम करतोय, आजही शिवसेना भवनात मराठी माणूस, हिंदू माणूस, मुस्लीम माणूस त्यांचे काम घेऊन येतोय असं प्रधान यांनी म्हटलं. 

दरम्यान, सत्ता मिळत नव्हती म्हणून उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता भाजपानं ओरबडून घेतली. राज्यावर ६ लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षाच्या पूर्ण कालावधीत देशातला नंबर वन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा गौरव केला हे काहींना पाहावलं नाही. नेमकं काय चुकलं? या अवस्थेत महाराष्ट्र उभा आहे. बंडखोरांना काय देण्यात कमी पडलं? शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे. ज्यांना शिवसेना माहिती नाही ते आता बोलत आहे. सुहास कांदेला ओळख शिवसेनेने दिली. भुजबळ पालकमंत्री असताना सुहास कांदे यांनी त्यांच्याविरोधात काम केले. निधी हा जनतेचा असतो. स्वत:चा नसतो असा टोला हर्षल प्रधान यांनी लगावला आहे.  

सत्तेच्या लोभापायी आमदार गेलेलोकांचा विश्वास जिंका असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे. बाळासाहेबांच्या आग्रहास्तव मी शिवसेनेत आलो. माझी निष्ठावंत अशी ओळख आहे, जीवनात यापेक्षा आणखी काय हवं? बंडखोर आमदार शिवसेनेला सोडून गेले नाहीत, बाळासाहेबांना सोडलं नाही तर त्यांना फसवलं गेले आहे. भाजपाचा डाव शिवसेना संपवण्याचा आहे. शिवसेना संपवण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय. सत्तेचा लोभ असणारी माणसं तिकडे गेली अशा शब्दात हर्षल प्रधान यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे